Ads

Thursday, February 11, 2021

वसिम जाफरला पाठिंबा द्यायला सरसावले भारतीय खेळाडू, पाहा नेमकं काय घडलं...

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने काल उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यावेळी जाफरने हे का केलं, याचं उत्तर मिळत नव्हतं. पण त्यानंतर जाफरने आपण हे कर्णधारपद का सोडलं आणि आपल्यावर काय आरोप करण्यात आले होते, हे त्याने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता जाफरला भारताच्या क्रिकटपटूंकडून चांगला पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. जाफरने राजीनामा दिल्यावर सांगितले की, " मी जय बिश्ताला कर्णधार करण्याचा ठराव दिला होता, पण अधिकाऱ्यांना मात्र इक्बाल अब्दुल्लाला कर्णधार करायचे होते. त्याचबरोबर मी संघाबरोबर असताना मौलवींना बोलवायचो, पण तसे मी कधीच केले नाही. मी उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला कारण संघाची निवड ही योग्यपद्धतीने होत नव्हती. त्याचबरोबर बऱ्याच अशा गोष्टी होत्या, ज्या मला करु दिल्या नाहीत. त्यामुळएच मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे." जाफरला यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, अनिल कुंबळे, डोड्डा गणेश यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळ इरफान म्हणाला की, " जाफर, तुला ही गोष्ट सांगावी लागली, हे दुर्देव आहे." जाफरने राजीनामा दिल्यावर त्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगितले की, " वसिम, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तु जे केलंस ते योग्यच केलं. फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटते की, त्या मुलांना आता तुझे मार्गदर्शन मिळणार नाही." जाफर हा पहिल्यांदा मुंबईकडून खेळत होता. त्यानंतर जाफर विदर्भाच्या संघाकडून खेळायला लागला. विदर्भाच्या संघाने ऐतिहासिक रणजी विजेतेपद पटकावले होते, त्यामध्ये जाफरचा मोलाचा वाटा होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जाफरने आपण प्रशिक्षक होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यात जाफरने उत्तराखंडच्या संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. जाफर जेव्हा उत्तराखंडच्या संघाचा प्रशिक्षक झाला होता तेव्हा त्याने जय बिश्ता, इक्बाल अब्दुल्ला आणि समद फलाह यांना संधी दिली होती. त्याचबरोबर काही सहाय्यक प्रशिक्षकांचीही निवड केली होती. पण जाफर प्रशिक्षक असताना उत्तराखंडच्या क्रिकेट संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. उत्तराखंडच्या क्रिकेट संघाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पाचपैकी फक्त एकच सामना जिंकला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OrMVCC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...