चेन्नई, : भारताच्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीवरील दडपण अजून वाढले आहे. त्याचबरोबर कोहलीवर जोरदार टीकाही होत आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर कोहली भारताचे कर्णधारपद सोडून देईल, असे मत इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉंटी पनेसार यावेळी म्हणाला की, " कोहली हा एक सर्वकालिन महान फलंदजांच्या यादीत आहे. पण त्याच्याकडून संघाचे नेतृत्व चांगले होताना दिसत नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग चार कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियामध्ये चांगले नेतृत्व केले होते. त्यामुळे कोहलीवर दडपण अजून वाढलेले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात जर भारताचा पराभव झाला तर तो नेतृत्व सोडून देईल, असे मला वाटते." पनेसार पुढे म्हणाला की, " भारताने जर दुसरा सामना गमावला तर कोहलीच्या नेतृत्वाखालील हा भाताचा सलग पाचवा पराभव असेल. त्यानंतर कोहली भारताचे कर्णधारपद सोडू शकतो, असे मला वाटते. कारण त्याच्यावर सध्याच्या घडीला जास्त दबाव आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून लौकिकाला साजेशी फलंदाजीही पाहायला मिळालेली नाही. या दडपणाचा परीणाम कुठेतरी त्याच्या फलंदाजीवर होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या फलंदाजीसाठी कोहली भारताचे कर्णधारपद सोडू शकतो, असे मला वाटते." गेल्या वर्षभरात कोहलीला एक शतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत चांगलाच धक्का बसला आहे. कारण कसोटीमधील फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीची आता पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर द्विशतक झळकावणाऱ्या जो रुटला क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या कामगिरीबाबत काय म्हणाला पनेसार, पाहा...इंग्लंडच्या विजयानंतर पनेसार म्हणाला की, " इंग्लंडच्या संघाने केलेली कामगिरी ही अविश्वसनीय आहे. इंग्लंडची ही कामगिरी नक्कीच बऱ्याच कालावधीपर्यंत लक्षात राहील."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a7q5IH
No comments:
Post a Comment