
नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिल रोजी सुरूवात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे आठ संघ आणि त्यांच्या खेळाडूंनी जोरदार तयारी सुरू केली असताना एका माजी कर्णधाराने खळबळजनक वक्तव्य केले आहे. वाचा- इंग्लंडचा माजी कर्णधार त्याच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. इंग्लंडच्या भारत दौऱ्यात देखील तो सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला होता. आता मायकल वॉनने आयपीएल आणि इंग्लंडच्या खेळाडूंसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. वॉनच्या मते इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्वत:ची ताकद ओळखावी आणि जे खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएलमधील संघाला महत्त्व देतात त्यांना गुडबाय म्हटले पाहिजे. वाचा- द टेलिग्राफ या वृत्तपत्रात वॉनने लेख लिहला आहे. यात त्याने ईसीबीचे डायरेक्टर एश्ले जाइल्स यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे. या मुलाखतीत जाइल्स यांनी राष्ट्रीय संघ सोडून खेळाडू आयपीएल मध्ये खेळण्याची भिती व्यक्त केली होती. वाचा- जाइल्स यांनी बीबीसीच्या माझ्या शो मध्ये सांगितले होते की, इंग्लंड आयपीएल संदर्भात त्याच्या खेळाडूंशी वाद घालणार नाही. कारण बोर्डाला मोठ्या खेळाडूंना दिर्घ कालावधीसाठी गमवण्याची भिती वाटते. वॉन म्हणतो, मला वाटते की, हा एक चुकीचा संदेश आहे. जर इंग्लंडचे २६-२७ खेळाडू माझ्याकडे येऊन म्हणाले की ते इंग्लंडचा मुख्य करार सोडून आयपीएल किंवा लीग क्रिकेट खेळणार आहेत. तर माझे साधे उत्तर असेल की, जा, पुन्हा भेटू गुडबाय. मी पैज लावतो की ते खेळाडू एक दोन वर्षात पुन्हा परत येतील. वाचा- हे थांबवण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर सारख्या खेळाडूंचे केंद्रीय करार काही वर्षांसाठी वाढवले पाहिजेत. जर इंग्लंड बोर्डाला खरच असे वाटत असेल तर ते सर्वोत्तम खेळाडूंना दोन किंवा तीन वर्षांचा करार का देत नाहीत. सर्वोत्तम कामगिरीसाठी तुमच्या चांगला खेळाडूंची काळजी घ्यावी. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dmx6Gc
No comments:
Post a Comment