Ads

Wednesday, April 14, 2021

IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

चेन्नई : अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करल्यानंतर राजस्थान रॉयल्सला अजून एक धक्का बसला आहे. कारण राजस्थानच्या संघातील एक दिग्गज खेळाडू आता यापुढे आयपीएल खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानच्या संघानेच ही माहिती दिली आहे. बेन स्टोक्सला पंजाब किंग्सविरुद्धचा पहिलाच सामना खेळत असताना गंभीर दुखापत झाली आहे. या सामन्यात स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली आहे. स्टोक्सला झालेली ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे आता स्टोक्सला आयपीएल खेळता येणार नाही, असे राजस्थानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी हा एक मोठा धक्का आहे. स्टोक्स हा सलामीला यायचा, त्याचबरोबर तो गोलंदाजीही करायचा. त्याचबरोबर स्टोक्सकडे चांगला अनुभवही होता. इंग्लंडच्या विश्वविजयात त्याचा मोलाचा वाटा होता. पण आता या दुखापतीमुळे तो राजस्थान रॉयल्सकडून खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता स्टोक्सच्या जागी कोणत्या खेळाडूला संघीत स्थान दिले जाते, हे महत्वाचे ठरणार आहे. आता जर एखाद्या खेळाडूला संघात स्थान दिले तर सर्वप्रथम त्याला करोना चाचणी करावी लागेल आणि सात दिवसांच्या क्वारंटाइननंतर त्याला संघात दाखल करता येईल. पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. प्रथम फलंदाजी करत पंजाबने राजस्थानला २२२ धावांचे आव्हन दिले होते. पण त्यांना २१७ धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशीर अशी फलंदाजी केली. कर्धार म्हणून संजूचा हा पहिलाच सामना होता. त्याने ६३ चेंडूत ११९ धावा केल्या. पण त्याचे हे शतक व्यर्थ गेले. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना तो बाद झाला. संजूने फक्त ५४ चेंडूत शतक केले. आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील संजूचे हे तिसरे शतक ठरले. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर संजूचा क्रमांक लागतो. विराटने पाच शतक केली आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aaumut

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...