Ads

Thursday, April 8, 2021

IPL 2021: इशांत शर्मासारखी कामगिरी एकाही गोलंदाजाला करता आली नाही, नावावर आहे हा विक्रम

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होणार आहे. पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. स्पर्धेतील दुसरी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. वाचा- गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. दिल्ली संघाकडे असलेल्या इशांत शर्माच्या नावावर असा एक विक्रम आहे जो स्पर्धेच्या इतिहासात आजवर कोणालाही करता आलेला नाही. इशांत हा आयपीएलमधील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. २०१२ आणि २०१८ वगळता तो कोणत्याना कोणत्या संघाकडून खेळला आहे. वाचा- इशांतने ९० सामन्यात ३६.१९च्या सरासरीने ७२ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये इशांतच्या नावावर असा एक विक्रम आहे जो आजवर कोणालाही करता आलेला नाही. इशांतने पॉवर प्ले मध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. २०११च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने कोच्ची टस्कर्स केरळा विरुद्ध ३ षटकात १२ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. वाचा- २००८ ते २०१० या काळात इशांत कोलकाता नाइट रायडर्सकडून तर २०११ आणि २०१२ डेक्कन चार्जर्सकडून खेळला. दुखापतीमुळे २०१२ साली तो मॅच खेळू शकला नाही. २०१३ ते २०१५ तो सनरायजर्स हैदराबाद, २०१६ मध्ये पुणे, २०१७ मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. २०१९ साली तो दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला. तेव्हा त्याने १६ सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या. वाचा- इशांत प्रमाणेच जयदेव उनाडकटच्या नावावर एक खास विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासात डेथ ओव्हर्समध्ये पाच विकेट घेणारे फक्त दोन गोलंदाज आहेत, त्यात जयदेवचा समावेश आहे. जयदेवने २०१७ साली पुण्याकडून खेळताना हैदराबादविरुद्ध अशी ४ षटकात ५ विकेट घेतल्या होत्या. तेव्हा त्याने १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर युवराज सिंगला बाद केले. त्यानंतर २०व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेत हॅटट्रिक घेतली होती. जयदेवने ४ षटकात ५ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या शिवाय एडम जम्पाने अशी कामगिरी केली आहे. जम्पाने २०१६ मध्ये ४ षटकात १९ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uwPUcD

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...