Ads

Tuesday, April 13, 2021

IPL 2021 : सूर्यकुमार तळपता तरी मुंबईचा डाव गडगडला, पाहा केकेआरला किती धावांचे दिले आव्हान

चेन्नई : सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावले, पण त्यानंतरही मुंबई इंडियन्सचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला केकेआरपुढे मोठा आव्हान ठेवता आले नाही. मुंबई इंडियन्सला यावेळी केकेआरपुढे १५३ धावांचे आव्हान ठेवता आले. कोलकाताने यावेळी नाणेफक जिंकली आणि मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. कारण या सामन्यात पुनरागमन करणारा क्विंटन डीकॉक बाद झाला, त्याला फक्त दोन धावा करता आल्या. मुंबईसाठी हा पहिला धक्का होता. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर मुंबईला धक्का बसला असला तरी त्यानंतर सूर्यकुमार यादव चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. कारण सूर्यकुमारने यावेळी रोहितपेक्षा जास्त आक्रमक खेळ केला आणि त्याने मुंबईची धावगती चांगलीच वाढवली. सूर्यकुमारने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साकारले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र सूर्यकुमारला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमारने बाद होण्यापूर्वी सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मुंबईला इशान किशनच्या रुपात लगेचच तिसरा धक्काही बसला. इशानला यावेळी एकच धाव काढता आली. मुंबईला आता एकामागून एक दोन धक्के बसले होते. त्यानंतर रोहित शर्मा संघाचा डाव कसा सावरतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण रोहितला यावेळी मुंबईची धावसंख्या वाढता आली नाही. कारण रोहितला यावेळी ३२ चेंडूंत ४३ धावा करता आल्या. पॅट कमिन्सने यावेळी रोहित शर्माला त्रिफळाचीत केले. रोहित बाद झाल्यावर हार्दिक पंड्याही लवकर बाद झाला आणि मुंबईचा डाव आता गडगडणार का, असे चाहत्यांना वाटत होते. त्यानंतर कायरन पोलार्डही लवकर बाद झाला आणि मुंबईचा डाव अडचणीत आला. पोलार्डला यावेळी फक्त पाच धावा करता आल्या. पोलार्डनंतर युवा मार्को जॅन्सन हादेखील शून्यावर बाद झाला आणि त्यांची ७ बाद १२६ अशी अवस्था झाली. आंद्रे रसेलने यावेळी मुंबईच्या पाच फलंदाजांना बाद केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uLkFdP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...