Ads

Thursday, April 1, 2021

IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलसाठी विराट कोहलीला सोडावी लागणार ही खास गोष्ट, नेमकी कोणती पाहा..

चेन्नई : तब्बल १४ कोटी २५ लाख रुपये मोजत आरसीबीच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीने आपल्या संघात दाखल करुन घेतले. पण मॅक्सवेलसाठी आता आरसीबीचा संघ एक खास प्लॅन आखत आहे. त्यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला आपली खास गोष्ट सोडावी लागणार आहे. मॅक्सवेल गेल्यावर्षी आयपीएलमध्ये अपयशी ठरला होता. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला संघात कायम ठेवले नव्हते. या गोष्टीचा फायदा आरसीबीच्या संघाने उचलला आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. आता एवढी मोठी रक्कम मॅक्सवेलसाठी आरसीबीने मोजली आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीचा कसा उपयोग करायचा हे आरसीबीने ठरवले आहे. पण मॅक्सवेलसाठी आता कोहलीला एक महत्वाची गोष्ट सोडावी लागणार आहे. मॅक्सवेलला आता मधल्याफळीत खेळवण्याची रणनिती आरसीबीचा संघ आखत आहे. कदाचित मॅक्सवेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवले जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कोहलीचे काय होणार, याची चिंता सर्वांनाच होती. पण या गोष्टीचे उत्तरही आरसीबीच्या संघाने दिले आहे. या हंगामात कोहलीला आपले तिसरे स्थान सोडावे लागणार आहे. कारण कोहली आपले खास तिसरे स्थान सोडून सलामीला येणार आहे. त्यामुळे मॅक्सवेलसाठी कोहली आता सलामीला येणार असून मॅक्सवेल आरसीबीच्या संघात नेमकी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. यापूर्वी कोहली २०१६ साली सलामीवीर म्हणून आरसीबीसाठी खेळला होता. यावेळी सलामीला येताना कोहलीने धावांची उधळण केली होती. कोहलीने या मोसमात तब्बल ९७३ धावा केल्या होत्या, यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर या वर्षी आरसीबीचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. याबाबत आरसीबीच्या संघाचे डायरेक्टर माइक हेसन यांनी सांगितले की, " मॅक्सवेल हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याबरोबर मध्या षटकांमध्ये मॅक्सवेल हा चांगली फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मॅक्सवेल हा एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो, कारण त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेचा चांगला वापर आम्ही करुन घेणार आहोत. मी मॅक्सवेलशी याबाबत चर्चा करणार आहे आणि त्याची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेणार आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3me5HdA

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...