Ads

Saturday, April 10, 2021

IPL 2021 : धोनीला पराभूत करण्यासाठी पंतला सापडला फॉर्म्युला, या त्रिमूर्तींची घेणार मदत

मुंबई : महेंद्रसिंग धोनीला पहिल्याच सामन्यात चीतपट करण्यासाठी आता दिल्ली कॅपिटल्सचा युवा कर्णधार रिषभ पंत सज्ज झाला आहे. धोनीला पराभूत करण्यासाठी पंतला आता एक नवीन फॉर्म्युला सापडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार पंत आता त्रिमूर्तींची मदत घेणार आहे. दिल्लीचे कर्णधारपद युवा पंतकडे असले तरी त्यांच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी संघातील तीन अनुभवी खेळाडूंची मदत आपण घेणार असल्याचे पंतने सांगितले आहे. यावेळी पंत म्हणाला की, " क्षेत्ररक्षण, डावपेच, नियोजन याबाबत मी शिखर धवन, रविचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्याशी सतत संवाद साधणार. तसेही यष्टीरक्षक असल्याने मी याआधी कर्णधार नसतानाही क्षेत्ररक्षणाच्या आखणीचे काम करतच होतो." दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज वानखेडे स्डेडियमवर सामना होणार आहे. चेन्नईचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी तर दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. म्हणूनच या लढतीकडे गुरू विरुद्ध शिष्य असे पाहिले जात आहे. गेल्या सत्रात दिल्ली संघाने सर्वांना धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तेव्हा दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते. यावेळी दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे आणि नेतृत्व युवा फलंदाज आणि विकेटकिपर पंतकडे देण्यात आहे आहे. दिल्ली संघाचा विचार केल्यास भारतीय संघातील अनुभवी शिखर धवन, त्यानंतर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि पंत ही फलंदाजीची फळी आहे. धवनने गेल्या हंगामात सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या. तर शॉने विजय हजारे स्पर्धेत द्विशतकासह ८२७ धावांचा पाऊस पाडला होता. या शिवाय दिल्लीकडे मार्कस स्टोयेनिस, शिमरोन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स सारखे अष्टपैलू आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे गोलंदाजीत इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि एनरिक नोजे ही दमदार फळी आहे. करोना क्वारंटाइनच्या नियमामुळे रबाडा आणि नोजे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. फिरकीपटूमध्ये आर अश्विन आणि अमित मिश्रा यांच्यावर जबाबदारी असेल. अक्षर पटेलला करोना झाल्याने तो उपलब्ध नसेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OEC74w

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...