Ads

Friday, April 2, 2021

निवड समितीने सांगूनही रोहित शर्मा २०११चा विश्वचषक का खेळू शकला नाही, पाहा मोठा खुलासा...

मुंबई : भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. पण या विश्वचषकात रोहित शर्माला खेळवण्यात आले नव्हते. त्यावेळी निवड समितीला रोहित हा संघात हवा होता. पण तरीही रोहितला विश्वचषकात का खेळवण्यात आले नाही, याबाबतचा एक मोठा खुलासा आज झाला आहे. भारताचा २०११ साली जेव्हा संघ निवडण्यात आला तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत हे निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी निवड समितीमध्ये असलेल्या राजा वेंकट यांनी आज हा खुलासा केला आहे. २०११च्या विश्वचषकासाठी रोहितला संघात स्थान मिळावे, असे निवड समितीला वाटत असल्याचे त्यांनी सांगतिले आहे. पण त्यावेळी रोहितला संघात न घेता एका खेळाडूला संधी देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. त्यामुळेच रोहितला २०११च्या विश्वचषकात खेळता आले नव्हते. मिड डे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेंकट यांनी सांगितले की, " २०११च्या विश्वचषकासाठी आम्ही १४ खेळाडू निवडले होते आणि १५वा खेळाडू म्हणून रोहित शर्माला निवडण्यात यावे, असे आम्ही सांगितले होते. पण संघ व्यवस्थापनाने हा निर्णय मान्य केला नाही. त्यांनी रोहितऐवजी पीयुष चावलाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. रोहित हा एक दर्जेदार खेळाडू होता आणि त्याच्यावर निवड समितीचा विश्वास होता. विश्वचषकाच्या संघासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे आम्हाला वाटत होते. पण संघ व्यवस्थापनाने यावेळी रोहितला न घेतला पीयुषला संघात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रोहित २०११च्या विश्वचषकात खेळू शकला नाही." याबाबत निवड समितीचे सदस्य सुरेंद्र भावे यांनी सांगितले की, " विश्वचषकाचा संघ निवडत असताना आम्हाला एका लेग स्पिनरची गरज होती. त्यावेळी पीयुष चावला हा फिट होता आणि तो चांगल्या धावाही करत होता. पीयुष हा चांगली गुगलीही टाकत होता. त्यामुळे पीयुषची निवड विश्वचषकाच्या संघासाठी करण्यात आली होती." भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी युवराज सिंगने अष्टपैलू कामगिरी करत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताबही पटकावला होता. त्यावेळी भारताकडून माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ४८२ धावा केल्या होत्या, त्याचबरोबर झहीर खानने भारताकडून सर्वाधिक २१ विकेट्स मिळवल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2R1OdFG

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...