मुंबई: २०२१ची सुरूवात आज म्हणजेच ९ एप्रिलपासून होणार आहे. तर अंतिम लढत ३० मे रोजी होईल. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही स्पर्धा होत आहे. या वर्षी मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. त्यांना या वर्षी सलग तिसरे आणि विक्रमी सहावे विजतेपद मिळवण्याची संधी आहे. वाचा- करोनामुळे या वर्षी देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येणार नाहीत. यावर्षाच्या आयपीएलसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात काय बदल करण्यात आले आहेत. वाचा- वेळ- या वर्षी आयपीएलच्या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. स्पर्धेत दुपारी होणाऱ्या लढती साडे तीन वाजता सुरू होतील. त्यासाठीचा टॉस ३ वाजता होईल. तर संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांचा टॉस ७ वाजता आणि प्रत्यक्षात सामना साडेसात वाजता सुरू होईल. याआधी जेव्हा भारतात सामने व्हायचे तेव्हा ते दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सुरू व्हायचे. वाचा- घरचे मैदान मिळणार नाही- आयपीएलमधील या वर्षातील सर्वात मोठा बदल म्हणजे कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर एकही सामना खेळता येणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईचा संघ चेन्नईत सर्वाधिक तर चेन्नईचा संघ मुंबईत सर्वाधिक सामने खेळेल. ही गोष्ट सर्व संघांना लागू आहे. तर चेंडू बदलला जाणार- जर एखाद्या फलंदाजाने मारलेला चेंडू मैदानाबाहेर गेला तर तो पुन्हा वापरला जाणार नाही. वाचा- फक्त ९० मिनिटे- या वर्षी आयपीएलमध्ये वेळेवर नजर ठेवली जणार आहे. प्रत्येक संघाला एक डाव ९० मिनिटात संपवावा लागेल. असे न झाल्यास संबंधिक कर्णधार आणि खेळाडूंना दंड केला जाईल. शार्ट रन चा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे- आयपीएल दरम्यान शॉर्ट रनचा निर्णय आता मैदानावरील अंपायर नव्हे तर तिसऱ्या अंपायरकडे असणार आहे. शॉर्ट रन वरून गेल्या हंगामात वाद झाला होता. याचे नुकसान पंजाब किंग्जला बसला होता. या शिवाय नॉ बॉलचा निर्णय देखील तिसऱ्या अंपायरकडे असेल. वाचा- लढत सॉफ्ट सिग्नल- या हंगामातून सॉफ्ट सिग्नलचा निर्णय काढून टाकण्यात आला आहे. आता जर मैदानावरील अंपायरला काही शंका असेल तर ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतील. याआधी तिसऱ्या अंपायरकडे जाण्याआधी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागत होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QdILPm
No comments:
Post a Comment