Ads

Saturday, April 3, 2021

मुंबईच्या वानखेडे मैदानावर करोनाचा शिरकाव; IPLच्या आयोजनाला मोठा धक्का

मुंबई : आयपीएल (IPL)च्या १४व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या वर्षी करोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील ६ शहरात सामन्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. करोनाच्या धोक्यामुळेच गेल्या वर्षी ही स्पर्धा युएईमध्ये भरवण्यात आली होती. पण जगातील सर्वात श्रीमंत स्पर्धा सुरू होण्याआधी करोनाची प्रकरणे समोर येत आहेत. वाचा- आयपीएलचे आयोजन करणाऱ्या बीसीसीआय()ला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत दोघा खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पण यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईतील वानखेडे मैदानावरील आठ ग्राउंड स्टाफना कोरनाची लागण झाली आहे. या मैदानावर १० ते २५ या कालावधीत आयपीएलच्या १० सामन्यांचे आयोजन होणार आहे. वाचा- द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार वानखेडे मैदानावरील १९ गाउंड स्टाफची आरटी-पीसीआर टेस्ट गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. यापैकी तिघांची रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तर एक एप्रिल रोजी अन्य पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. वाचा- पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्ह आढळलेले गाउंड स्टाफना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले होती की नाही याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. आयपीएल सुरू होण्यास फक्त सहा दिवस शिल्लक राहिले असताना करोनाची प्रकरणे समोर येत असल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे. वाचा- स्पर्धा सुरू होण्याआधी प्रथम कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि आज दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या देशात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वाधिक संख्या महाराष्ट्र आणि मुंबईत आहेत. आयपीएलच्या १४व्या हंगामात ५६ सामने होणार असून अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OgNLSP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...