Ads

Tuesday, April 13, 2021

IPL 2021 : रोहित शर्माचे ख्रिस गेलवर विचारलेल्या प्रश्नावर खणखणीत उत्तर, म्हणाला...

चेन्नई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एका प्रश्नावर खणखणीत उत्तर दिले आहे. रोहितला यावेळी पंजाब किंग्सचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहितने या प्रश्नावर खणखणीत उत्तर दिले असून त्याचे चाहते चांगलेच खूष झाले आहेत. सोमवारी पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात ख्रिस गेलने ४० धावा केल्या. पण राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील ३५०वा षटकार खेचला. आयपीएलमध्ये आतापर्यंत एवढे षटकार कोणत्याही फलंदाजाला फटकावता आलेले नाहीत. त्यामुळे गेलचा हा विक्रम कोण मोडू शकेल का, याची उत्सुकता सर्वांना असेल. या आयपीएलपूर्वी गेलच्या नावावर ३४९ षटकार होते. गेलने बेन स्टोक्सच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि आयपीएलमधील आपले ३५० षटकार पूर्ण केले. यानंतर रोहितला ख्रिस गेलच्या या विक्रमाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित म्हणाला की, " ख्रिस गेलच्या नावावर आतापर्यंत आयपीएलमधील सर्वाधिक षटकार आहे, पण माझ्याएवढे चौकार गेलला आयपीएलमध्ये मारता आलेले नाहीत." कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर ४५८ चौकार आहेत, पण दुसरीकडे गेलला आतापर्यंच आयपीएलमध्ये ४०० चौकारही पूर्ण करता आलेले नाहीत. त्यामुळे रोहितने दिलेले हे उत्तर त्याच्या चाहत्यांना पंसतीस पडले आहे. मुंबई इंडियन्स उभारणार का विजयाची गुढी, पाहा...मुंबई इंडियन्सच्या संघातील काही खेळाडूंनी यावेळी आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अर्जुन तेंडुलकर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे आणि हार्दिक पंड्या यांनी आपल्या चाहत्यांना खास मराठीमध्ये गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल तर कोलकाताची नजर दुसरा विजय मिळून गुणतक्तात अव्वल स्थानी झेप घेण्याची असेल. या दोन्ही संघातील आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स अधिक मजबूत दिसतो. या दोन्ही संघात गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघातील गेल्या पाच सामन्यात कोलकाताने फक्त एकात विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या लढतीत देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tfETw8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...