Ads

Monday, April 12, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार महत्वाचा खेळाडू...

चेन्नई : मुंबई इंडिन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता दुसऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात एक महत्वाचा खेळाडू दाखल होणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ अधिक सक्षम होण्यासाठी मदत मिळणार आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती. पण धावचीत झाल्यामुळे त्याला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण त्यानंतर ख्रिस लीन आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सावरले होते. पहिल्या सामन्यात सलामीवीर क्विंटन डीकॉक हा खेळणार नव्हता. दक्षिण आफ्रिकेची पाकिस्तानबरोबर मालिका सुरु होती आणि डीकॉक हा तिथे खेळत होता. त्यानंतर तो भारतात दाखल झाला होता. त्यानंतर डीकॉक क्वारंटाइन झाला होता आणि त्यामुळेच ख्रिस लीनला संधी देण्यात आली होती. पण आता डीकॉकचा क्वारंटाइनचा कालावधी संपलेला आहे आणि तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघात हा एक मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकेल. लीनने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला वगळण्याची जोखीम मुंबई इंडियन्सचा संघ घेणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कारण एका संघात फक्त चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. संघात कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट यांचे स्थान तर जळपास निश्चित समजले जात आहे. त्यामुळे जर डीकॉक आणि लीन या दोघांनाही खेळवायचे असेल तर त्यांना मार्को जॅन्सनला संघातून बाहेर काढावे लागू शकते. पण त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचा एक पर्याय कमी होऊ शकतो. त्यामुळे मार्कोला संघातून काढणे हे त्यांना परवडणारे नसेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फॉर्मात असलेल्या लीनला संधी द्यायची की डीकॉकला खेळवायचे या मोठा प्रश्न मुंबई इंडियन्सला सोडवावा लागणार आहे. कदाचित लीनला अजून एक संधी देण्यात येऊ शकते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dXyb7C

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...