Ads

Monday, April 12, 2021

IPL 2021 : ख्रिस गेलने पहिल्याच सामन्याच सामन्यात रचला विक्रम, आयपीएलमधला ठरला पहिलाच खेळाडू...

मुंबई : पंजाब किंग्सचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आपल्या पहिल्याच सामन्यात विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले आहे. गेलने पहिल्याच सामन्यात जी कामगिरी केली आहे, ती आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला आयपीएलमध्ये करता आलेली नाही. गेलने आज सुरु असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील ३५०वा षटकार खेचला. आयपीएलमध्ये आतापर्यंत एवढे षटकार कोणत्याही फलंदाजाला फटकावता आलेले नाहीत. त्यामुळे गेलचा हा विक्रम कोण मोडू शकेल का, याची उत्सुकता सर्वांना असेल. या आयपीएलपूर्वी गेलच्या नावावर ३४९ षटकार होते. गेलने बेन स्टोक्सच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि आयपीएलमधील आपले ३५० षटकार पूर्ण केले. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटाकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स होता. हे आयपीएल सुरु होण्यापूर्वी आयपीएमध्ये एबीने १६९ सामने खळले होते. या १६९ सामन्यांमध्ये एबीने ४८४९ धावा केल्या असून त्याच्या नावावर २३५ षटकार होते. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी हा तिसऱ्या स्थानावर आहे. कारण धोनीने हे आयपीएल सुरु होण्यापूर्वी आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले होते. धोनीच्या नावावर १८२ डावांमध्ये ५४३२ धावा असून त्याने आतापर्यंत २१६ षटकार लगावले होते. पहिल्या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.त्यामुळे त्याच्या षटकारांमध्ये कोणताच बदल झालेला नाही. या आयपीएलमध्ये पहिला षटकार आणि चौकार लगावण्याचा मान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मिळाला. आयपीएलमध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. हे आयपीएल सुरु होण्यापूर्वी रोहित आयपीएलमध्ये २०० सामने खेळला होता. या २०० सामन्यांमध्ये कोहलीने ५२३० धावा केल्या असून २१३ षटकार लगावलेले होते. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कोहली हे आयपीएल सुरु होण्यापूर्वी १९२ सामने खेळला होता. या १९२ सामन्यांमध्ये कोहलीच्या नावावर ५८७८ धावा असून त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण २०१ षटकार लगावले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PP0wVK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...