Ads

Sunday, April 11, 2021

IPL 2021 CSK vs DC: पराभवानंतर निराश झाला धोनी, गोलंदाजांना म्हणाला...

मुंबई: चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२१ची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सात विकेट त्यांच्यावर विजय मिळवला. वानखेडेवर झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १८८ धावांचे आव्हानात्म लक्ष्य दिले होते. पण दिल्लीने विजयाचे लक्ष्य ८ चेंडू शिल्लक ठेवून पार केले. सामना झाल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी गोलंदाजांच्या कामगिरीवर निराश होता. वाचा- चेन्नईच्या गोलंदाजांनी स्वत:च्या चुकांपासून शिकण्याची गरज आहे. विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य दिल्लीने आठ चेंडू शिल्लक असताना पार केले. यावर धोनी म्हणाला, आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी अपेक्षे प्रमाणे कामगिरी केली नाही. अतिशय खराब गोलंदाजी केली. या सामन्यात गोलंदाजांनी धडा घेतला आहे आणि पुढील सामन्यात ते चांगली कामगिरी करतील. वाचा- या सामन्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली होती. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पराभवानंतर बोलताना धोनी म्हणाला, दव फॅक्टरवर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असता. त्याचा विचार करून आम्हाला जास्ती जास्त धावा करायच्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस धावा करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर मोइन अली आणि सुरेश रैना यांनी डाव सावरला. रैनाने धमाकेदार अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात सॅम करन आणि रविंद्र जडेजा यांनी चेन्नईला १८८ अशी मोठी धावसंख्या उभी करून दिली. कर्णधार धोनी शुन्यावर बाद झाला. वाचा- विजयासाठी आव्हानात्मक धावसंख्या समोर असताना दिल्लीच्या सलामीवीरांनी शानदार सुरूवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी १३ षटाकत १३६ धावा केल्या. येथेच दिल्लीचा विजय पक्का झाला होता. शिखर आणि पृथ्वी यांनी तुफानी अर्धशतक केले. अखेर कर्णधार पंतने चौकार मारून विजय मिळून दिला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3287s2o

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...