Ads

Thursday, November 5, 2020

५ नोव्हेंबरचे तीन भारतीय महान क्रिकेटपटूंबरोबर आहे खास कनेक्शन, या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील...

मुंबई : आज पाच नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवसाचे भारतीय क्रिकेटमध्ये खास महत्व आहे. कारण आजचा दिवस हा तीन भारतीय महान क्रिकेटपटूंबरोबर जोडला गेलेला आहे. हे तीन महान क्रिकेट आहेत माजी कर्णधार सुनील गावस्कर, माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. सुनील गावस्कर हे भारताचे महान क्रिकेटपटू होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा दहा हजार धावा या गावस्कर यांच्या नावावर आहेत. गावस्कर यांना क्रिकेट विश्वात एक मानाचे स्थान आहे. पण गावस्कर यांनी आजच्या दिवशीच आपला अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर गावस्कर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ५ नोव्हेंबर १९८७ साली गावस्कर यांनी आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. हा सामना भारतामध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकातील होता. या सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये झाला होता. त्यामुळे आजचा दिवस चाहत्यांच्या नक्कीच लक्षात असेल. त्यामुळे आजचा दिवस गावस्कर आणि त्यांचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. आजचा दिवस हा सचिन तेंडुलकरसाठीही महत्वाचा आहे. सचिनने क्रिकेटमध्ये बरेच विश्वविक्रम रचले. त्याचबरोबर क्रिकेटमधील बरीच यशाची शिखरे त्याने पादाक्रांत केली. पण सचिन आजचा दिवस कधीही विसरू शकणार नाही. कारण आजच्या दिवशीच सचिनची भारतीय संघात निवड झाली होती. पाच नोव्हेंबर १९८७ साली निवड समितीने सचिनची निवड भारतीय संघासाठी केली होती. त्यानंतरच सचिनसारखा महान खेळाडू भारतीय संघाला मिळाला होता. त्यामुळे आजचा दिवस सचिन आणि त्याचे चाहते कधीही विसरू शकणार नाहीत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या विराटने १९व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला येथे पदार्पण केले होते. विराटने भारताकडून ८६ कसोटी, २४८ वनडे आणि ८२ टी-२० सामने खेळले आहेत. जगातील काही मोजके फलंदाज असे आहेत ज्यांची सरासरी कसोटी, वनडे आणि टी-२०मध्ये ५०च्या वर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. २०११ सालच्या वर्ल्ड कप आणि २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात विराट होता. त्यानंतर २०१४ साली महेंद्रसिंह धोनीकडून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व स्विकारले तर जानेवारी २०१७ साली मर्यादीत षटकांच्या संघाचा देखील तो कर्णधार झाला. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नक्कीच महत्वाचा असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2I7GuBN

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...