Ads

Thursday, November 5, 2020

Virat Kohli Birthday: विराट कोहलीचे हे पाच विक्रम मोडणे अशक्य

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आज ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या विराटने १९व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला येथे पदार्पण केले होते. आक्रमक फलंदाजीद्वारे जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेल्या विराटने भारताकडून ८६ कसोटी, २४८ वनडे आणि ८२ टी-२० सामने खेळले आहेत. जगातील काही मोजके फलंदाज असे आहेत ज्यांची सरासरी कसोटी, वनडे आणि टी-२०मध्ये ५०च्या वर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. २०११ सालच्या वर्ल्ड कप आणि २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात विराट होता. त्यानंतर २०१४ साली महेंद्र सिंह धोनीकडून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व स्विकारले तर जानेवारी २०१७ साली मर्यादीत षटकांच्या संघाचा देखील तो कर्णधार झाला. वाचा- विराट हा मैदानावरील त्याच्या आक्रमक नेतृत्वासाठी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठे विजय मिळवले आहेत. विराटच्या नेतृत्वाखालीच भारताने २०१९ साली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला होता. टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वाखाली अनेक मालिका जिंकल्या असल्या तरी आता त्याला प्रतिक्षा आहे ती आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची. विराटच्या नेतृत्वाखाली भारत २०१७च्या चॅम्पिटन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण तेव्हा पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे लक्ष्य विराटचे असेल. वाचा- फिटनेसला वेगळ्या उंचीवर नेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण जागतिक क्रीडा क्षेत्रात विराटची ओळख ही फिटनेससाठी केली जाते. विराटने फिटनेसला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. विराटच्या मते खेळ मोठ्या प्रमाणात बदलला आहे. फिटनेस शिवाय कोणत्याही खेळाडूला संघात स्थान टिकवून ठेवणे शक्य नाही. भारताकडे आज सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत जे देश आणि विदेशात विजय मिळून देऊ शकतात. याचे मुख्य कारण फिटनेस आहे. वाचा- होणार आयपीएलमध्ये विराट विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व करतो. या वर्षी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. २००८ साली १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट आयपीएलमध्ये दाखल झाला होता. २०१३ पासून तो या संघाचे नेतृत्व करतोय. आयपीएलच्या १३ हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटचे नाव अव्वल स्थानी आहे. १९१ सामन्यात त्याने ५ हाजर ८७२ धावा केल्या आहे. पण अद्याप त्याला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. या वर्षी सहा नोव्हेंबर रोजी विराटची लढत एलिमेनेटर सामन्यात सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. विराटचे पाच विक्रम जे मोडणे अशक्य १) कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक झळकावम्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत कसोटीत ६ वेळा द्विशतक केले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा ५ द्विशतकासह दुसऱ्या स्थानावर आहे. २) वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात ६ शतक करणारा विराट हा जगातील एकमेव कर्णधार आहे. विराटने वनडेत २०१७ साली ६ शतक केली होती. एक खेळाडू म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १९९९ साली ९ शतके केली होती. ३) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग चार मालिकेत चार द्विशतक करणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. विराटने २०१६ ते २०१७ या काळात चार कसोटी मालिकेत ही कामगिरी केली होती. विराटने तेव्हा सर डॉन ब्रॅडमन (१९३०-३२) आणि राहुल द्रविड (२००३-०४) यांचा विक्रम मोडला होता. या दोघांनी सलग ३ मालिकेत ३ द्विशतक केली होती. ४) वनडेत सर्वात वेगाने ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने १७५ डावात ८ हजार, १९४ डावात ९ हजार, २०५ डावात १० हजार तर २२२ डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ५) भारताकडून सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत ७ वेळा द्विशतक केले आहे. आगामी काही वर्षात तो आणखी काही शतक करू शकतो. विराटचे लक्ष्य आता सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याचा असेल. त्यांनी कसोटीत १२ द्विशतक केली आहेत. दुसऱ्या स्थानावर कुमार संगकारा असून त्याने ११ द्विशतक केली आहेत. तर ब्रायन लाराने ९ वेळी अशी कामगिरी केली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3etu6aZ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...