Ads

Sunday, January 3, 2021

बायो प्रोटोकॉल तोडणाऱ्या त्या पाचा भारतीय खेळाडूंच्या करोना चाचणीचा रिपोर्ट आला

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंसाठी गेला आठवडा सर्वात कठीण असा ठरला. पाच भारतीय खेळाडूंनी बायो बबल प्रोटोकॉलचा नियम मोडला आणि जेवणासाठी एका रेस्टॉरेंटमध्ये गेले. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांच्या या प्रोटोकॉल तोडण्यावरून बरीच टीका देखील झाली होती. या सर्वांना अन्य खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या मिडियाने देखील यावर मोठी टीका केली होती. वाचा- सिडनी कसोटी आधी झालेल्या या प्रकारामुळे व्यवस्थापन काळजीत पडले होते. हे पाच भारतीय खेळाडू बाहेर जेवणासाठी गेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या एक भारतीय चाहत्याने त्याचे फोटे सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेची चौकशी सुरू केली होती. खबरदारी म्हणून बीसीसीआयने या पाचही खेळाडूंना अन्य खेळाडूंपासून वेगळे ठेवले होते. मेलबर्न ते सिडनी असा प्रवास देखील त्यांनी स्वतंत्रपणे केला होता. वाचा- भारताच्या या पाच खेळाडूंवर बायो बबल प्रोटोकॉलचा नियम तोडल्याची टीका होत असताना. या सर्वांनी हे दाखवून दिले आहे की त्यांनी प्रोटोकॉलच्या नियमाचे पालन केले आहे. तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघातील या पाचही खेळाडूंच्या करोना चाचणीचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. वाचा- बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०२१ रोजी संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफची करोनासाठीची RT-PCR चाचणी झाली. या सर्वांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. ऑस्ट्रेलिया मिडियाकडून सातत्याने पाच खेळाडूंनी बायो बबल प्रोटोकॉल नियम तोडल्याची चर्चा होत असताना भारतीय संघ व्यवस्थापनाने मात्र सिडनी क्रिकेट मैदानावर ७ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. वाचा- माध्यमांनी काय म्हटले हा खेळाडूंचा काळजीचा विषय नाही. आम्ही तिसऱ्या कसोटीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. कारण मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. खेळाडूंनी बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा बायो बबल प्रोटोकॉल निमय तोडला नाही हेच आम्ही समजतोय, असे संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले. तिसऱ्या कसोटीनंतर आम्हाला मालिकेतील चित्र २-१ असे पाहायचे असल्याचे ते म्हणाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2X82ZdW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...