Ads

Wednesday, January 6, 2021

AUS vs IND 3rd Test: तिसऱ्या कसोटी सामना या गोष्टीमुळे थांबवला जाऊ शकतो, पाहा नेमकं कारण...

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून खेळवण्यात येणार आहे. पण हा सामाना एका गोष्टीमुळे थांबवला जाऊ शकतो, असे चित्र सध्याच्या दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कारण हा सामना निर्णायक ठरू शकतो आणि त्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळू शकते. पण हा तिसरा सामना एका गोष्टीमुळे थांबवलाही जाऊ शकतो. याबाबतचे नेमकं कारण आहे तरी काय, पाहा... तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी क्युरेटर अॅडम लुईस यांनी खेळपट्टी तयार केली आहे. पण लुईस यांनी यावेळी हा सामना कोणत्या गोष्टीमुळे थांबला जाऊ शकतो हेदेखील सांगितले आहे. यावेळी लुईस म्हणाले की, " या सामन्यासाठी खेळपट्टीबरोबर वातावरणही महत्वाचे ठरणार आहे. कारण या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सामन्याच्यावेळी जर जोरात पाऊस आला तर नक्कीच सामना थांबवला जाऊ शकतो. एकदा सामना सुरु झाला की आमच्या हातामध्ये काहीच नसते. त्यामुळे या सामन्याच्यावेळी वातावरण नेमके कसे असेल, याकडेही आमचे लक्ष आहे." सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. पण संघ व्यवस्थापनाने सैनीवर विश्वास दाखवला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसा असेल?असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पण या कसोटीत रोहित नेमका कोणत्या स्थानावर खेळणार, याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत स्पष्ट केले आहे. रोहितच्या स्थानाबद्दल अजिंक्य म्हणाला की, " रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज भारतीय संघात दाखल झाला आहे. त्याचबरोबर रोहितने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. रोहितने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे आणि त्याचाच फायदा संघाला झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित सलामीवीर म्हणून खेळायला येईल."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nqkhO8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...