Ads

Saturday, December 12, 2020

India vs Australia: ऑस्ट्रेलिया आणि भारत- सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची सुरू होणार आहे. मालिकेची सुरूवात डे-नाइट कसोटीने होणार असून ही मॅच एडिलेड येथे होईल. कसोटी सामन्याचा निकाल तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत विरुद्ध संघाच्या २० विकेट घेतल्या जात नाही. सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेण्याची गरज असते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर... वाचा- अनुल कुंबळे (भारत)भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकूण कसोटी मालिकेत अनिल कुंबळे असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने १०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० कसोटी सामन्यात १११ विकेट घेतल्या आहेत. त्याने एका सामन्यात १० वेळा १० विकेट घेण्याचा आणि एका डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी १० वेळा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व देखील केले आहे. वाचा- हरभजन सिंग (भारत) या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये टर्बनेटर हरभजन सिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १८ कसोटीत ९५ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरभजनची कामगिरी शानदार होती. त्याने कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. वाचा- नाथन लायन (ऑस्ट्रेलिया) ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने भारताविरुद्ध ८५ विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. १८ कसोटी सामन्यात त्याने ३२.६०च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत. लायनने सात वेळा डावात पाच विकेट तर एक वेळा सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. कपिल देव (भारत)भारताच्या कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७९ विकेट घेतल्या आहेत. त्यांनी २० कसोटीत ही कामगिरी केली. एका डावात सात वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. १०६ धावा देत ८ विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. आर अश्विन (भारत) या यादीत पाचव्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे. त्याने १५ कसोटी सामन्यात ७७ विकेट घेतल्या आहेत. डावात पाच वेळा पाच विकेट तर सामन्यात एक वेळा १० विकेट घेतल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gJSJkP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...