Ads

Tuesday, December 15, 2020

IND vs AUS : भारतीय संघातीलच हे पाच खेळाडू डोकेदुखी ठरत आहेत, कोहलीचे टेंशन वाढले

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिला कसोटी सामना आता दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघातील पाच खेळाडू हे डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीचे टेंशन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. १) पृथ्वी शॉची अधिक आक्रमकताभारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा अधिक आक्रमक खेळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आक्रमकपणे फलंदाजी करताना पृथ्वी हा लवकर बाद हत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण पृथ्वीला सराव सामन्यात छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे पृथ्वीला पहिल्या सामन्यात खेळवायचे की नाही, हा प्रश्न भारतीय संघापुढे असेल. २) मयांक अगरवाल ठरतोय नापासभारताचा सलामीवीर मयांक अगरवालने आयपीएल चांगलीच गाजवली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात मात्र मयांक हा मोठी खेळी साकारण्यात सातत्याने अपयशी ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मयांकला मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे मयांकचा फॉर्म हा संघासाठी नक्कीच मोठी डोकेदुखी असेल. ३) राहुल आणि विहारी यांचा दावा कमजोरलोकेश राहुल आणि हनुमा विहारी यांचा दावा सध्याच्या घडीला कमजोर समजला जात आहे. कारण राहुलला एकही सराव सामना खेळण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे तो कसोटी सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल, याबाबत प्रश्नचिह्न आहे. गेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात हनुमा विहारीने सलामीची जबाबदारी पार पाडली होती. पण यावेळी हनुमा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाही. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी सामन्यात संधी द्यायची का, याचा विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे. ४) सलामीसाठी भारतासाठी चार दावेदारसलामी करण्यासाठी भारतीय संघाकडे चार दावेदार आहेत. पण यांच्यापैकी नक्की कोणाला संधी द्यायची, हा मोठा प्रश्न भारतीय संघाला सोडवावा लागणार आहे. कारण पृथ्वी शॉ हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही. शुभमन गिल हा एक भारतीय संघासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण दोन्ही सराव सामन्यांमध्ये गिलला संधी दिली होती. गिलने मोठी खेळी साकारली नसली तरी त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर लोकेश राहुल आणि हनुमा विहारी हेदेखील सलामीवीराच्या शर्यतीमध्ये आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3akeWVk

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...