Ads

Tuesday, December 15, 2020

IND vs AUS Test: भारताचा ऑस्ट्रेलियाशी पंगा; पहिल्या कसोटीत कोणाचे पारडे जड?

सिडनी: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. एडिलेट येथे होणाऱ्या पहिली कसोटी डे-नाइट असणार आहे. भारतीय दौऱ्यात वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती तर टी-२० मालिकेत भारताने बाजी मारली. आता कसोटी मालिका जो जिंकेल त्याचे दौऱ्यावर वचर्स्व असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गेल्या वेळी भारताने त्यांचा कसोटी मालिकेत पराभव केला होता. भारतीय संघ या वर्षी पुन्ही अशी कामगिरी करले का याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आहे. वाचा- कसोटी मालिकेची सुरूवात पिंक बॉलने होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने याआधी अनेक डे-नाइट सामने खेळले आहेत. तर भारतीय संघाने एकच डे-नाइट कसोटी सामना खेळला आहे, तो ही बांगलादेशविरुद्ध. ऑस्ट्रेलियाला पिंक बॉल कसोटीचा अनुभव जास्त असल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. भारतीय संघ प्रथमच परदेशात डे-नाइट कसोटी खेळत आहे. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशात परतणार आहे. पहिल्या कसोटीला सामोरे जाण्याआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. यामुळे संघ व्यवस्थापनासमोर निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. वाचा- शुभमन गिल, मयांक अग्रवला, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना टीकू दिले नाही. फिरकीटपटूंमध्ये आर अश्विन देखील कमाल करू शकतो. त्याला कुलदीप यादवची सोबत महत्त्वाची ठरू शकले. सराव सामन्यात ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी शतकी खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघातील मधळी फळी मजबूत झाली आहे. युवा फलंदाज शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत चांगले संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्यात त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. गिलने ४३ आणि ६५ धावा केल्या. मयांक अग्रवाल देखील परत फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या होत्या. चेतेश्ववर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली. पहिल्या सराव सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले. तर दुसऱ्या डावात पुजाराने अर्धशतक केले. वाचा- ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाले तर त्यांना संघात दुखापतीचे ग्रहण लागले आहे. कारण गेल्या आठवड्याभरात ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बदलामुळे भारतीय संघाची चिंता वाढू शकते. ऑस्ट्रेलियाने संघात मिचेल स्टार्कला आणि अष्टपैलू मोइसेन हेनरिक्सचा समावेश केला आहे. हेनरिक्स फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. त्याला तब्बल चार वर्षांनी संघात स्थान मिळाले आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी मॅच असेल, जी २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात होईल. हा लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. तिसरी कसोटी नव्या वर्षात म्हणजे ७ जानेवारी ते ११ जानेवारी या काळात सिडनी क्रिकेट मैदानावर होईल. तर मालिकेतील अखेरची कसोटी १५ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर खेळवली जाईल. वाचा- कसोटी मालिकेचे वेळापत्रक पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता)


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3abYYfX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...