Ads

Wednesday, December 9, 2020

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात पंचांवर आली हेल्मेट घालायची पाळ, व्हिडीओ झाला व्हायरल...

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात मैदानावरील पंचांवर चक्क हेल्मेट घालायची पाळी आल्याचे आता पाहायला मिळत आहे. कारण पंचांनी एका गोष्टीचा चांगलाच धसका घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी हेल्मेट घातले होते. या सामन्यात नेमकी अशी कोणती गोष्ट घडली, याचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीटल तिसरा सामना सुरु होण्यापूर्वी पंच गेराल्ड अबुट हे मैदानात दाखल झाले होते. त्यावेळी मैदानात एका कॅमेराला ते आपटले, कारण त्यांचे लक्ष नव्हते. ते क्रीझकडे पाहत होते. पण हा कॅमेरा डोक्यावर आदळल्यावर मात्र अबुट यांनी चक्क हॅल्मेट मागवले आणि त्यानंतर त्यांनी सामन्यात हॅल्मेट घालूनच पंचगिरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पंच गेरार्ड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ही आपली चुक मान्य केली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय संघाला शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बुन हे या तिसऱ्या लढतीमध्ये सामनाधिकारी होते. बुन यांनी भारतीय संघाची ही चुक आयसीसीला दाखवली असून त्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला शिक्षा केल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघावर संथ गोलंदाजी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कारण भारताने निर्धारीत वेळेत आपील २० षटके पूर्ण केली नव्हती. हा आरोप भारताचा कर्णधार विराट कोहलीला सांगण्यात आला. त्यानंतर कोहलीले आपल्यावरील हा आरोप मान्य केला आहे. त्याचबरोबर आयसीसीने जी शिक्षा दिली आहे तीदेखील कोहलीने मान्य केली आहे. त्यामुळेच या गोष्टीची औपचारीक घोषणा करण्यात आलेली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37MN4Xl

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...