Ads

Monday, December 14, 2020

IND vs AUS: अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाचे दडपण असेल का, सुनील गावस्कर यांनी मांडले स्पष्ट मत

सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे कर्णधारपद करायची संधी मिळणार आहे. पण भारतीय संघाचे नेतृत्व करताना अजिंक्यवर किती दडपण असेल, याबाबतचे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर याबाबत म्हणाले की, " अजिंक्यने धरमशाला येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताचे नेतृत्व केले होते. या सामन्यात अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानबरोबर झालेल्या कसोटी सामन्यातही अजिंक्यने भारताचे नेतृत्व केले होते आणि हा सामनाही भारताने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अजिंक्यवर कर्णधारपदाचे दडपण असेल, असे मला तरी वाटत नाही." अजिंक्यला ही गोष्ट नक्कीच माहिती असेल... ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्व करताना अजिंक्यला नेमकी कोणती गोष्ट माहिती असेल याबाबतही गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " अजिंक्यला यावेळी नेतृत्व करताना एक गोष्ट नक्की माहिती असेल की, तो एक हंगामी कर्णधार आहे. कारण त्याा फक्त तीन कसोटी सामन्यांमध्येच कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे माझ्यामते जोपर्यंतय दडपणाचा प्रश्न आहे, अजिंक्यवर ते जास्त नसेल. त्यामुळे त्याला या सर्व गोष्टी चांगल्या माहिती असल्यामुळे अजिंक्य जास्त दडपण घेणार नाही." ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-१९ साली झालेल्या कसोटी मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. यावेळी मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता तो चेतेश्वर पुजाराला. गावस्कर यांनी यावेळी पुजाराबाबत सांगितले की, " पुजारा गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. पण या गोष्टीचा पुजारावर कोणताही परीणाम होणार नाही, असे मला तरी वाटते. पुजारा हा एक चांगला फलंदाज आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहायलाा मजा येते. त्यामुळे पुजाराने जास्तीत जास्त काळ फलंदाजी करावी, असे मला तरी वाटते. कारण गोलंदाजांचा समर्थपणे सामना कसा करायचा, हे तंत्र पुजाराला चांगलेच अवगत आहे आणि त्याचा तो चांगला वापर करताना दिसत आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37gC5Gr

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...