Ads

Friday, December 11, 2020

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला चेंडू, गंभीर दुखापतीमुळे सोडालं लागलं मैदान

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या संघातील दुखापतींचे प्रमाण आता वाढायला लागले आहे. कारण भारताविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या डोक्यावर चेंडू आदळल्याचे पाहायला मिळाले आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे या खेळाडूला थेट मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात आता चिंतेचे वातावरण आहे. कारण पहिल्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला डोक्याला चेंडू लागला होता. त्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराने अर्धशतक झळकावत भारताची लाज राखली. या सामन्यात फलंदाजी करत असताना बुमराने एक स्ट्रेड ड्राइव्ह लगावला. त्यानंतर हा चेंडू गोलंदाजी करत असलेल्या कॅमेरुन ग्रीनच्या बोटाला लागला आणि त्यानंतर थेट डोक्याच्या उजव्या बाजूला आदळला. या दुखापतीनंतर संघाच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. ग्रीनची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांना समजले आणि त्यांनी ग्रीनला मैदानातून बाहेर नेले. ग्रीनवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल आज संध्याकाळी मिळणार आहे. त्यानंतरच ग्रीन या सामन्यात खेळू शकणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकते. सराव सामन्यात डोक्यावर बॉल लागलेला ग्रीन हा दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सराव सामन्यात ग्रीनच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना आता पुढे आली आहे. या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. सिडनी मैदानावर सुरू असेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच या देखील सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37cOLyh

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...