Ads

Monday, December 14, 2020

वाढदिवस कुलदीप यादवचा; सचिनने दिलेल्या शुभेच्छा झाल्या हिट

नवी दिल्ली: भारताचा चायनामॅन गोलंदाज आज २५वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे जन्मलेल्या कुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ मार्च २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. वाचा- कुलदीपने २०१५च्या आयसीसी १९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेत निवड समितीच्या नजरेत आला होता. २०१७ साली त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. कुलदीपने ८८ आंतरराष्ट्रीय सामन्यात १६८ विकेट घेतल्या आहेत. वनडेत सर्वात वेगाने १०० विकेट घेणारा तो सर्वात वेगवान फिरकीपटू आहे. इतक नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. वाचा- सद्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातील कसोटी मालिकेत कुलदीप यादवचा जलवा पाहायला मिळू शकतो. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरून खास शुभेच्छा दिल्या आहे. सचिनच्या या शुभेच्छाचा मेसेज व्हायरल होत आहे. वाचा- सचिनने कुलदीपला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऑस्ट्रेलियातून परत येताना विजय मिळवून या अशा शुभेच्छा दिल्या आहेत. कुलदीप यादवचे विक्रम >> कुलदीपने क्रिकेटच्या तिनही प्रकारात पाच विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. तर एकमेव फिरकीपटू. अशी कामगिरी भुवनेश्वर कुमारने केली आहे. वनडे, कसोटी आणि टी-२० मध्ये पाच विकेट घेणारा तो जगातील फक्त तिसरा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप वगळता दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहीर आणि श्रीलंकेचा अजंता मेंडिस यांनी ही कामगिरी केली आहे. >> कुलदीपने भारताकडून जेव्हा कसोटीत पदार्पण केले तेव्हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा तो पहिला गोलंदाज होता. >> वनडे क्रिकेटमध्ये कुलदीप यादवने इंग्लंडविरुद्ध १० षटकात २५ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. >> कुलदीप हा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा हॅटट्रिक केली आहे. कुलदीप करिअरच्या सुरुवातीला जलद गोलंदाजी करायचा पण नंतर त्याचे कोस कपिल पांडे यांनी फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याच्या करिअरमधील निर्णायक ठरला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ksfi1C

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...