Ads

Thursday, December 10, 2020

आयपीएलमध्ये १० संघ नेमके कधी पाहायला मिळतील, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये १० संघ नेमके कधी पाहायला मिळतील, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कारण यावर्षीचे संपल्यावर स्पर्धेत १० संघ जिंकतील, असे म्हटले जात होते. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची खास माहिती दिली आहे. आयपीएलमधील दोन नवीन संघांसाठी अदानी ग्रुप आणि संजीव गोएंका ग्रुप हे शर्यतीत अग्रस्थानी होते असे म्हटले जात होते. यावर्षीचे आयपीएल हे मार्च-एप्रिल महिन्यात खेळवण्यात येईल, असे म्हटले जात आहे. पण स्पर्धेपूर्वी आयपीएलचा लिलाव होणार आहे. त्याचबरोबर करोनाशी लढण्यासाठी कोणत्या सुरक्षाव्यवस्था करायच्या, हेदेखील बीसीसीआयला पाहावे लागणार आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश असावा असा बीसीसीआयचा मानस आहे. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी फार कमी अवधी राहीलेला आहे. त्याचबरोबर खेळाडूंचा लिलावही होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी आयपीएलमध्ये १० संघ दिसतील, असे वाटत नाही. पण २०२२ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये आपल्याला दोन नवीन संघ दिसू शकतील. त्यामुळे २०२२ साली आयपीएलमध्ये १० संघ दिसू शकतील, असे आम्हाला वाटत आहे." बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, " सध्या आयपीएलचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टारबरोबरचा बीसीसीआयचा करार हा २०२१ साली संपत आहे. त्यामुळे हा करार संपल्यावर आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात यावा, असे बीसीसीआयमधील बऱ्याच जणांना वाटत आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे. ही सभा काही दिवसांमध्ये होणार आहे. या सभेत पुढील वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येईल. त्यावेळीच आयपीएलमध्ये किती संघ ठेवायचे, याचा निर्णय घेण्यात येईल." स्टारबरोबरचा आयपीएलच्या प्रसारणाचा करार २०२१ साली संपत आहे. त्यानंतर बीसीसीआय प्रसारणाच्या हक्कासाठी निविदा काढणार आहे. या निविदा काढताना आयपीएलमध्ये नेमके किती संघ असतील, याची माहितीही त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे जेव्हा या निविदा निघतील तेव्हा आयपीएलमधील संघांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KfrvGs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...