Ads

Wednesday, January 6, 2021

AUS vs IND 3rd Test: तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा कोणत्या स्थानावर खेळणार, अजिंक्य रहाणेने केला खुलासा

सिडनी, : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पण या कसोटीत रोहित नेमका कोणत्या स्थानावर खेळणार, याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत स्पष्ट केले आहे. रोहितच्या स्थानाबद्दल अजिंक्य म्हणाला की, " रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज भारतीय संघात दाखल झाला आहे. त्याचबरोबर रोहितने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. रोहितने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे आणि त्याचाच फायदा संघाला झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित सलामीवीर म्हणून खेळायला येईल." सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. पण संघ व्यवस्थापनाने सैनीवर विश्वास दाखवला आहे. सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी स्टार फलंदाज रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत मयांक अग्रवालला धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या जागी रोहितला संधी देण्यात आली आहे. रोहितचा फक्त संघात समावेश झाला नाही तर त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीचे महत्त्वा वाढले आहे. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने नेतृत्व आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने कसोटी नेतृत्व केलेल्या आतापर्यंतच्या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XcnDJK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...