नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वा हंगाम भारता ऐवजी युएईमध्ये घेण्यात आला. आता आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप २०२१ साली होणाऱ्या आयपीएलच्या तारखांची घोषणा केली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील ही सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा १० एप्रिलच्या आधी सुरू होऊ शकते. आयपीएलच्या १४व्या हंगामाबद्दल अद्याप काही घोषणा केली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलच्या आधी ही स्पर्धा सुरू होऊ शकते. कारण इंग्लंडचा भारत दौरा २८ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर २०२१चे आयोजन होऊ शकते. वाचा- बीसीसीआयने गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे मालिकेची घोषणा केली. इंग्लंडचा दौरा दोन महिन्याचा आहे. पाच फेब्रुवारी रोजी चेन्नई कसोटीपासून याची सुरूवात होईल आणि २८ मार्च रोजी पुणे येतील वनडे मालिकेने त्याचा अखेर होईल. या मोठ्या दौऱ्यानंतर खेळाडू संबंधित संघाच्या सराव सत्रात भाग घेण्याआधी ब्रेक घेतील. वाचा- आयपीएल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची आशा आहे. त्याआधी जर बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव करू शकते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या नव्या खेळाडूंशी समन्वय साधता येईल. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये नव्या संघाला सहभागी करून घेण्याचा निर्णय २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाऊ शकतो. वाचा- पूर्ण हंगाम महाराष्ट्रात होणार... आयपीएलचा १४वा हंगाम भारतातच घेणार आहे. १३व्या हंगामा प्रमाणेच संपूर्ण स्पर्धा फक्त ३ मैदानावर घेतली जाऊ शकते. युएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजा मैदानावर सर्व सामने झाले होते. जोपर्यंत करोना परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत सामने कमीत कमी मैदानावर घेण्याचा भर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा १४वा हंगाम महाराष्ट्रात होऊ शकतो. एकट्या मुंबईत दोन आंतररष्ट्रीय मैदान (वानखेडे आणि ब्रेबोर्न) आहेत. त्याच बरोबर पुणे आणि नागपूरमध्ये देखील आंतरराष्ट्रीय मैदान आहे. या शिवाय नवी मुंबईत देखील क्रिकेट मैदान आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nbgUeA
No comments:
Post a Comment