Ads

Thursday, December 3, 2020

IND vs AUS: रोहित शर्माच्या नावावर मैदानात न उतरताही झाला विक्रम, टीम इंडियाला टाकलं मागे

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळला नव्हता. पण मैदानात न उतरताही रोहितच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम रचताना रोहितने संपूर्ण टीम इंडियामधील सर्व खेळाडूंना मागे टाकले आहे. रोहित हा सध्याच्या घडाली आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकलेला नाही. पण तरीही रोहितच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे. या पूर्ण वर्षात रोहितसारखी कामगिरी कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेला नाही. कारण या वर्षात सर्वाधिक धावांची खेळी ही रोहितच्या नावावर आहे. त्यामुळे मैदानात न उतरताही रोहितच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहितने १९ जानेवारीला बंगळुरु येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ११९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. ही भारताच्या फलंदाजाकडून या वर्षात झालेली सर्वोत्तम खेळी आहे. त्यानंतर या यादीमध्ये दुसरा क्रमांक हा हार्दिक पंड्याचा लागतो. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये हार्दिकने नाबाद ९२ धावांची खेळी साकारली होती. पण रोहित शर्माचा या वर्षातील सर्वाधिक खेळीचा विक्रम मात्र अजूनही आबाधित राहिलेला आहे आणि त्याला कोणीही हात लावू शकणार नाही. कारण आता या वर्षामध्ये भारतीय संघ कोणताही एकदिवसीय सामना खेळणार नाही. कारण यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० आणि कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक खेळीचा विक्रम हा रोहितच्या नावावरच असणार आहे. रोहित हा सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. त्याचबरोबर ११ डिसेंबरला रोहितची फिटनेस चाचणी होणरा आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तर त्याला ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यावर जाता येईल. पण रोहितला ऑस्ट्रेलियामध्ये कसे पाठवायचे आणि त्याला तिथे किती दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे, हे मात्र अजून ठरलेले नाही. पम रोहित जर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तर त्याचा फायदा नक्कीच भारतीय संघाला होऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JuyifC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...