कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात काही महत्वाचे बदल उद्याच्या सामन्यात होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर काही खेळाडूंनी उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात सलामीवीरापासून बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीला लोकेश राहुल येऊ शकतो. कारण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये राहुल हा आतापर्यंत सलामीला आलेला आपण पाहत आहोत. त्यामुळे शिखर धवनबरोबर उद्याच्या सामन्यात राहुल सलामीला येईल. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येईल. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी मात्र श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत मनीषला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात एकही संधी दिलेली नाही. त्याचबरोबर श्रेयसला आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात मनीषला संधी मिळू शकते, अशी दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू सॅमसनलाही संधी मिळू शकते. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यापैकी नेमकी कोणाला संधी द्यायची, हा प्रश्न भारताच्या संघाला सोडवावा लागणार आहे. कारण चहलने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. पण कुलदीपने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यााचबरोबर जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांना उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकते. पण गेल्या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि टी. नटराजन यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्याचडबरोबर भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने करणार का, याची उत्सुकताही चाहत्यांना नक्कीच असेल. कारण भारताने वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० मालिका ते जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mBQEcK
No comments:
Post a Comment