Ads

Tuesday, December 1, 2020

IND VS AUS: मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

कॅनबेरा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विकम मोडण्याची सुवर्ण संधी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शमीने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. तिसऱ्या वनडेमध्ये जर शमीने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्याकडे १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी नक्कीच असेल. कारण १८ वर्षांपूर्वीच एक विक्रम आता शमीला खुणावत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना हा उद्या कॅनबेरा येथे होणार आहे. या सामन्यात जर शमीने अचूक मारा करत दोन विकेट्स मिळवल्या तर त्याला १८ वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडता येणार आहे. तिसऱ्या सामन्यात शमीने दोन विकेट्स मिळवले तर सर्वात जलद भारतासाठी १५० बळी मिळवणारा तो गोलंदाज ठरू शकतो. शमी यावेळी १८ वर्षांपूर्वीचा कोणाचा विक्रम मोडू शकतो, पाहा.... आतापर्यंत शमीच्या नावावर ७९ एकदिवसीय सामने आहेत. या ७९ वनडे सामन्यांमध्ये शमीने १४८ बळी मिळवले आहेत. यापूर्वी भारताकडून सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा विक्रम हा अजित आगरकरच्या नावावर होता. आगरकरने ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले १५० बळी पूर्ण केले होते. त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये सर्वात जलद १५० बळी मिळवण्याचा मान शमीला मिळू शकतो. पण त्यासाठी त्याने या सामन्यात दोन बळी मिळवणे गरजेचे असेल. शमीने जर या वनडे सामन्यात १५० बळी मिळवले तर तो सर्वात जलद एवढे बळी मिळवण्याच्या यादीत तिसऱ्य क्रमांकावर पोहोचू शकतो. कारण सर्वात जलद १५० बळी पूर्ण करण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. कारण स्टार्कने ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० बळी पूर्ण केले होते. त्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू साकलेन मुश्ताकने १५० वनडे सामन्यांमध्ये १५० बळी मिळवले होते. त्यानंतर या यादीमध्ये शमीचा तिसरा क्रमांक लागू शकतो. पण त्यासाठी शमीने तिसऱ्या वनडेमध्ये दोन विकेट्स मिळवणे महत्वाचे असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lpHiQ3

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...