Ads

Friday, December 4, 2020

IND vs AUS : भारतीय संघासाठी गूड न्यूज, तब्बल २४ दिवसांच्या क्वारंटाइननंतर हा सदस्य मैदानात उतरणार

कॅनबेरा, : भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतील संघातील एक सदस्य तब्बल २४ दिवसांच्या क्वारंटाइननंतर मैदानात उतरणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय संघाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या सर्वात जवळची संघातील व्यक्ती असलेले थ्रोडाउन एक्सपर्ट डी राघवेन्द्र हे गेल्या २४ दिवसांपासून क्वारंटाइनमध्ये होते. त्यानंतर आता त्यांना भारतीय संघाबरोबर सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी राघवेंद्र हे भारतीय संघाबरोबर सराव करताना दिसतील. कुठे फसलं होतं राघवेंद्र...सिडनी हेराल्ड या ऑस्ट्रेलियातील वर्तमापत्राने रघुवेंद्र यांच्याबाबतची माहिती दिली आहे. रघुवेंद्र हे ९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सिडनी येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. कारण ऑक्टोबरमध्ये रघुवेंद्र हे करोना पॉझिटीव्ह सापडले होते. खरंतर एकदिवसीय मालिकेपूर्वी रघुवेंद्र यांना संघाबरोबर सराव करायचा होता. पण ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर रघुवेंद्र यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी पुन्हा एकदा रघुवेंद्र यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी हा १४ दिवसांपासून २४ दिवसांचा करण्यात आला होता. आता शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी रघुवेंद्र हे भारतीय संघाबरोबर सराव करताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. रघुवेंद्र हे १४० किलोमीटर प्रति तास या वेगाने चेंडू टाकतात. त्याचबरोबर ते चेंडू चांगला स्विंगही करतात आणि एका मिनिटामध्ये ते चार चेंडू टाकतात. त्यामुळे रघुवेंद्र यांची परदेशी दौऱ्यात संघाला नितांत गरज असते. रघुवेंद्र हे २०१४ सालापासून भारतीय संघाबरोबर आहे. त्याचबरोबर कर्णधार कोहलीचे ते आवडते आहेत. कोहलीने आपल्या यशामध्ये रघुवेंद्र यांचाही मोठा वाटा आहे, असे बऱ्याचदा सांगितले होते. रघुवेंद्र यांना दुखापतीमुळे क्रिकेटपटू होता आले नव्हते. पण भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून रघुवेंद्र हे भारतीय संघात सपोर्ट स्टाफ म्हणून दाखल झाले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37AUT2c

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...