Ads

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: भारताच्या ऐतिहासिक विजयात मुंबईकर शार्दुल ठाकूरने उचचला मोलाचा वाटा

कॅनबेरा, : भारताच्या या ऐतिहासिक विजयात मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. शार्दुलला या मालिकेत आज पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शार्दुलने या संधीचे सोने करत संघाच्या विजयात चांगलाच हातभार लावला. संधीचे सोने कसे करून घ्यायचे, याचा उत्तम वस्तुपाठ आज शार्दुल सर्वांना दाखवून दिला. आतापर्यंत भारताची गोलंदाजी चांगली होत नव्हती. पण आजच्या तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. या तीन फलंदाजांमध्ये गेल्या दोन्ही सामन्यात शतके झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथचाही समावेश होता. शार्दुलने या सामन्यात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला फक्त सात धावांवर बाद केले. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्याचबरोबर दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा जो गॅप होता तो आता भारताने स्मिथला बाद करत भरून काढला आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे शार्दुलने आजच्या सामन्यात हा सर्वात मोठा धक्का ऑस्ट्रेलियाच्या संघाला दिला होता. कारण स्मिथ लवकर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला मोठी धावसंख्या रचता आली नाही आणि हेच भारताच्या विजयाचे महत्वाचे कारण ठरले. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण आजच्या सामन्यात विजय मिळवत भारताने इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नव्हता. त्यामुळे भारताने या सामन्यात तब्बल १२ वर्षांनी पहिला-वहिला विजय मिळवलेला आहे. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱअयातील हा पहिला विजय आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJnPeR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...