Ads

Thursday, December 10, 2020

रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारालाच सांगितला संघाचा प्लॅन, सामन्यापूर्वी दिली महत्वाची माहिती

सिडनी, : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारालाच आपल्या संघाचा प्लॅन सांगितल्याची धक्कादायक माहिती आता पुढे येत आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच शास्त्री यांनी महत्वाची माहिती ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला दिल्याचे आता पुढे येत आहे. याबाबतचा खुलासा ऑस्ट्रेलियाच्या त्याला माजी क्रिकेटपटूंनीच केला आहे. भारतासाठी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका स्वात महत्वाची आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच शास्त्री यांनी प्रतिस्पर्धी देशाच्या माजी कर्णधारापुढे आमली महत्वाची माहिती उघड केल्याचे आता समजते आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांना शास्त्री यांनी भारतीय संघाबाबत महत्वाची माहिती दिल्याचे आता पुढे येत असून याबाबतचे वृत्त दैनिक जागरण या संकेतस्थळाने दिले आहे. याबाबत चॅपेल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, " मी आणि रवी शास्त्री त्या दिवश ड्रिंक्स घेत होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, उमेश यादव हा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज असेल. कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा हे दोन गोलंदाज भारताकडे आहेत. पण इशांत शर्मा या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी ही उमेश यादववर देण्यात येईल. त्याचबरोबर अॅडलेडच्या मैदानात जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना ३००पेक्षा जास्त धावा बनवेल त्यांना सामना जिंकण्याची नामी संधी असेल." आतापर्यंत विराट कोहलीच आक्रमक कर्णधार आहे, असे बऱ्याच जणांना माहिती होते. पण अजिंक्य रहाणेही कर्णधार म्हणून आक्रमक असून तो चांगले नेतृत्व करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी चॅपेल यांनी अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात आक्रमक नेतृत्व केले होते, यावरही प्रकाशझोत टाकला आहे. याबाबत चॅपेल म्हणाले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक सामना धरमशाला येथे झाला होता. या सामन्यात अजिंक्यने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. यावेळी अजिंक्य हा कसा आक्रमक कर्णधार आहे, हे पाहायला मिळाले होते. कारण त्यावेळी वॉर्नर फॉर्मात होता. त्यावेळी अजिंक्यने फिरकीपटू कुलदीप यादवला गोलंदाजी दिली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण कुलदीपने वॉर्नरला बाद केले." चॅपेल पुढे म्हणाले की, " भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी कमी धावा हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली नव्हती आणि भारताच्या विकेट्सही पडल्या होत्या. त्यावेळी अजिंक्यने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. माझ्यामते कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकपणा हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे रहाणेचे नेतृत्व मला आवडते. कारण त्याची नेतृत्व करण्याची शैली ही भिन्न आहे. आतापर्यंत त्याला ज्यावेळी संधी मिळाली आहे, त्यावेळी रहाणेने चांगले नेतृत्व केले आहे. पण आता रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तो संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IGyEQ0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...