कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या मालिकेत पराभव झालेल्या भारतीय संघाची आज टी-२० मोहिम सुरू होणार आहे. कॅनबेरा येथे आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-२० सामना होणार असून या लढतीत भारताचे पारडे जड आहे. भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियामधील कामगिरी शानदार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील Live अपडेट (India vs Australia )वाचा- >> पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय >> विकेट! दीपक चाहरने घेतली हेनरिकेसची विकेट; ऑस्ट्रेलिया ६ बाद १२६ >> चहलची गुगली! मॅथ्यू वेड बाद, ऑस्ट्रेलिया ५ बाद ११२ >> विकेट! नटराजनने डार्सी शॉर्टला केले बाद; ऑस्ट्रेलिया ४ बाद ११३ >> १४ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद १०४ धावा >> १२ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद ८५ धावा >> भारताला मिळाली मोठी विकेट, नटराजनने घेतली मॅक्सवेलची विकेट; ऑस्ट्रेलिया ३ बाद ७५ >> पुन्हा चहलची जादू, संजू सॅमसनने घेतला शानदार कॅच; स्मिथ बाद, ऑस्ट्रेलिया २ बाद ७२ >> बदली खेळाडू चहलने घेतली एरॉन फिंचची विकेट, ऑस्ट्रेलिया १ बाद ५६ >> चहलने मिळून दिली पहिली विकेट, हार्दिक पांड्याने घेतला सुपर कॅच >> विराट कोहलीने सोडला कॅच >> ६ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ५३ धावा>> ४ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या ३३ धावा >> २ षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या १६ धावा >> ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात >> रविंद्र जडेजाची धमाकेदार फलंदाजी, पहिल्या टी-२०मध्ये भारताच्या ७ बाद १६१ धावा >> हार्दिक पांड्या १६ धावांवर बाद, भारत ६ बाद ११४ >> १६ षटकानंतर भारताच्या ५ बाद १०४ धावा >> भारताला आणखी एक झटका, राहुल ५१ धावांवर बाद >> भारताची आणखी एक विकेट, मनिष पांडे बाद; भारत ४ बाद ९०>> संजू सॅमसन २३ धावावर बाद, भारत ३ बाद ८६>> केएल राहुलचे अर्धशतक, ३७ चेंडूत केल्या ५० धावा >> १० षटकानंतर भारताच्या २ बाद ७५ धावा >> ८ षटकानंतर भारताच्या २ बाद ५६ धावा >> मोठी विकेट! विराट कोहली ९वर बाद, भारत २ बाद ४८>> ६ षटकानंतर भारताच्या १ बाद ४२ धावा >> ५ षटकानंतर भारताच्या १ बाद ३० धावा >> ४ षटकानंतर भारताच्या १ बाद २१ धावा >> भारताला पहिला धक्का, शिखर धवन १ धाव करून बाद; भारत १ बाद ११ >> २ षटकानंतर भारताच्या ६ धावा >> केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली भारताच्या डावाला सुरूवात >> भारताकडून टी नटराजन टी-२० मध्ये पदार्पण करणार >> India vs Australia 1st T20: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> भारताने खेळलेल्या त्यांच्या गेल्या आठच्या आठ टी-२० लढतीत विजय मिळवला आहे. यातील दोन लढती सुपर ओव्हरमध्ये जिंकल्या होत्या. >> ऑस्ट्रेलियाने २०१९ पासून १३ पैकी १० टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. >> भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ९ टी-२० सामने खेळले आहेत त्यापैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33FLjtO
No comments:
Post a Comment