Ads

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांना ही एक गोष्ट करताच आली नाही

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आज तिसरा वनडे सामना सुरु आहे. पण या तिन्ही सामन्यांत भारताच्या एकाही फलंदाजाला आतापर्यंत ही एक गोष्ट करताच आली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ही एक मोठी तफावत आहे. या एक गोष्ट आतापर्यंत भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली आहे. आतापर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या संघातील एकाही फलंदाजाला अजूनपर्यंत शतक झळकावता आलेले नाही. ऑस्ट्रेलिआविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दिक पंड्याने केल्या होत्या. पहिल्या सामन्यात हार्दिकने ९० धावांची खेळी साकारली होती. पण या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी शतके साकारली होती. या दोन शतकांच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक ८९ धावांची खेळी कर्णधार विराट कोहलीने केली होती. यावेळी त्याचे शतक ११ धावांनी हुकले होते. पण या सामन्यात स्टीव्हन स्मिथने सलग दुसरे शतक लगावले होते आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर या दोन्ही लढतींमध्ये सामनावीराचा पुरस्कार शतक झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथलाच मिळाला होता. आजच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावसंख्या हार्दिक पंड्याने केली. पंड्याने या सामन्यात ७६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबा ९२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण या सामन्यातही भारताच्या फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. त्यामुळे आता या सामन्यात भारतीय संघ जिंकणार का आणि ऑस्ट्रेलियाकडून कोणता फलंदाज शतक झळकावणार का, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. पण तरीही कोहलीवर तब्बल ११ वर्षांनंतर एक नामुष्की ओढावलेली पाहायला मिळाली आहे. . गेल्या ११ वर्षानंतर पहिल्यांदाच कोहलीला वर्षभरात एकही शतक करता आलेले नाही आणि हा नकोसा विक्रम कोहलीच्या नावावर ११ वर्षांनी झालेला आहे. या वर्षात मात्र कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही. या वर्षात कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ही ८९ एवढी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HYXVo2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...