Ads

Tuesday, February 2, 2021

IND vs ENG : कपड्यांचा व्यापारी बनवतोय चेन्नईची खेळपट्टी, धक्कादायक निर्णय

चेन्नई, : एका कपड्यांच्या व्यापाऱ्याला आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना होणाऱ्या चेन्नईची खेळपट्टी बनवण्यास सांगितले आहे. व्ही. रमेश कुमार हे कपड्यांचे व्यापारी आहेत. पण त्यांना जेव्हा चेन्नईची खेळपट्टी बनवण्यास सांगितली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला होता. रमेश हे सिटी तिरपूर येथे कपड्याचे व्यापारी आहेत. आतापर्यंत एकदाही त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यांसाठी खेळपट्टी बनवलेली नाही. याबाबत जेव्हा रमेश यांना समजले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत रमेश यांनी सांगितले की, " तामिळनाडू क्रिकेट संघटनेने मला दोन कसोटी सामन्यांसाठी खेळपट्टी बनवण्यास सांगितली आहे. पण या निर्णयामुळे मीदेखील चकित झालो आहे." आतापर्यंत रमेश यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांसाठीही खेळपट्टी बनवली नाही. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची खेळपट्टी बनवण्याचा अनुभव नाही. पण तरीही त्यांच्याकडे तामिळनाडू क्रिकेट संघटनेने एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्यासाठी रमेश आता आपले काम चोख बजावत आहेत. बहुतांशी क्युरेटर हे पिच मेकिंगची कला शिकून घेतात आणि त्यानंतर अनुभवाच्या जोरावर खेळपट्टी बनवण्यास तयार होतात. पण रमेश यांच्याकडे या गोष्टीचा कोणताही अनुभव नाही. रमेश हे आपल्या महाविद्यालयीन जीवनात चांगले अॅथलीट होते. तामिळनाडूचे त्यांनी ११० मीटर धावण्याचा शर्यतीमध्ये प्रतिनिधीत्व केले होते, त्याचबरोबर ते राज्याच्या रिले संघाचेही सदस्य होते. रमेश यांनी १९९६ साली दोन राष्ट्रीय पदके जिंकलेली आहे. रमेश यांची पत्नी मालारविजी गिरी या चार्टर्ड अकाउंटेंट आहेत. चेन्नईची खेळपट्टी असेल तरी कशी, पाहा... चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असेल. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते, असे म्हटले जात आहे. चेन्नईमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36zcPKC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...