Ads

Tuesday, February 2, 2021

ऑस्ट्रेलियातील यशा मागे होता राहुल द्रविड; अजिंक्यने मुलाखतीत केला मोठा खुलासा

मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ने स्वत:कडे राखली. भारतीय संघाच्या या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण विराट कोहली नसताना आणि संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसल्यावर अजिंक्यने युवा खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३६ वर ऑल आउट झाला होता. त्यानंतर अजिंक्यकडे जबाबदारी आली. ही जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडली. अजिंक्यला हे सर्व करता आले कारण त्याला भारताचा दिग्गद क्रिकेटपटू राहुल द्रविडने एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना अजिंक्यने हा खुलासा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत राहुलने अजिंक्यला सांगितले होते की, नेट्समध्ये अधिक फलंदाजीचा सराव करू नको आणि कर्णधारपद असताना अतिरिक्त दबाव घेऊ नको. वाचा- राहुल भाईने मला मालिकेच्या आधी फोन केला होता. तेव्हा आम्ही दुबईतून ऑस्ट्रेलियाला जात होतो. कोणताही दबाव घेऊ नको. मला माहिती आहे की पहिल्या कसोटीनंतर तुला नेतृत्व करायचे आहे. पण काळजी करू नको. मानसिकरित्या मजबूत रहा. नेट्समध्ये अधिक फलंदाजी करू नको. राहुल भाईकडून तुम्ही कधीच अशा प्रकारच्या सल्ल्याची अपेक्षा करत नाही, असे अजिंक्य म्हणाला. वाचा- रहाणेने कर्णधारपद संभाळल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत आठ विकेटनी विजय मिळवला. त्यानंतर तिसरी सिडनी कसोटी ड्रॉ झाली आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला. वाचा- राहुलने मला नेट्समध्ये अधिक सराव करू नको असे सांगितले. तुझी तयारी चांगली सुरू आहे. फलंदाजी छान करतोयस. दबाव घेऊ नको. फक्त याचा विचार कर की तु संघाला कसे नेतृत्व देशील आणि खेळाडूंचा आत्मविश्वास कसा वाढवशील. परिणामांचा विचार करू नको, सर्व काही चांगले होईल. द्रविड सोबत झालेल्या या चर्चेने माझे काम सोपे झाले, असे अजिंक्य म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NQ5Vdy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...