चेन्नई, : उद्यापासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. अजूपर्यंत या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही. पण तरीही भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या डावाची सलामी कोण करणार, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बाबा झाल्यानंतर नेमकं कसं वाटत आहे, याबाबतही कोहलीने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाने सलामीसाठी बरेच पर्याय वापरले होते. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामी करण्याची संधी कोणाला द्यायची, हा भारतीय संघापुढे प्रश्न होता. त्याचबरोबर कोहली संघात आल्यामुळे एका खेळाडूला संघाबाहेर राहावे लागणार आहे. पण तरीही कोहलीने आपल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय संघाची सलामी कोण करणार, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. चेन्नईत उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे भारतासाठी सलामीची धुरा सांभाळतील, असे संकेत कोहलीने दिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि गिल यांनी दमदार फलंदाजी करत चांगली सलामी दिली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहित आणि गिल हेच सलामीला येतील, असे संकेत कोहलीने यावेळी दिले आहेत. रिषभ पंतबाबत कोहली नेमकं काय म्हणाला... यावेळी रिषभ पंतबद्दलही कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. पंतबाबत कोहली म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाने पंतने दमदार फलंदाजी केली होती. तो भारतासाठी मॅच विनरही ठरला आहे. पंतने फलंदाजीवर अथक मेहनत घेतली आहे आणि तो चांगल्या फॉर्मममध्येही आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नक्कीच आम्ही पंतला संधी देणार आहोत." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली फक्त एकच कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यने भारताचे नेतृत्व केले होते. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता आणि ऐतिहासिक मालिका विजय साकारला होता. त्यानंतर प्रथमच कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3axL4mX
No comments:
Post a Comment