Ads

Thursday, February 4, 2021

'बीसीसीआयने क्रिकेटपटूंना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावू नये'

मुंबई : शेतकऱ्यांचे आंदोन गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. पण भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह भारताच्या खेळाडूंनी गेल्या काही तासांमध्ये याबाबात ट्विट केले. यानंतर बीसीसीआय या क्रिकेटपटूंना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावत आहे, असा आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. कार्ती चिदंबरम यांनी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "प्रिय बीसीसीआय, भारताच्या क्रिकेटपटूंना तुम्बी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ट्विट करायला लावू नका, कारण ते बालिश वाटतं..." भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आज भारताच्या अन्य क्रिकेटपटूंनीही यावर भाष्य करत ट्विट केले आहे. हे सर्व बीसीसीआयने घडवून आणले आहे, असा आरोप आता कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. पण याबाबत बीसीसीआयने अजूनही कोणते भाष्य केल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे बीसीसीआय यावर आता काय भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नेमके काय ट्विट केले आहे, पाहा... सचिन तेंडुलकर भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. विराट कोहली सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणे जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39Mv6q5

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...