Ads

Thursday, February 4, 2021

सचिन तेंडुलकरच्या शेतकरी आंदोलनाच्या ट्विटनंतर भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. पण सचिनच्या या ट्विटनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही यावेळी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. शेतकरी आंदोलनाबाबत विराट कोहली म्हणाला...सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग नेमकं काय म्हणाला, पाहा...भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेने ट्विट करत काय सांगितले, पाहा...जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jiAZOE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...