Ads

Thursday, February 4, 2021

सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ झालाय व्हायरल...

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काल शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनच्या या ट्विटनंतर वाद-विवाद चांगलेच रंगत आहेत. पण त्याचवेळी शिवसेना प्रमुख दिवंगत यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी सचिनबद्दल भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. बाळासाहेबांनी आपल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं आहे... बाळासाहेबांची एका जुन्या मुलाखतीमधील सचिनबाबतचे वक्तव्य आता चांगलेच व्हायरल झाले आहे. बाळासाहेबांनी सचिनबद्दल म्हटले होते की, " जेव्हा कोणी सचिनकडे मदत मागतं तेव्हा तो आपली बॅट किंवा टी-शर्ट अशा गोष्टींचा लिलाव करतो. पण या गोष्टीला मदत म्हणत नाहीत. मदत करायची असेल तर ती वेगळ्या स्वरुपात असायला हवी" गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. सचिनने याबाबत काल ट्विट केले होते. सचिनच्या या ट्विटनंतर नवा वादंग सुरु झाला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oNp1Oq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...