Ads

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: तब्बल ११ वर्षांनंतर विराट कोहलीवर ओढावली नामुष्की, पाहायला मिळाली नकोशी कामगिरी

कॅनबेरा, : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६३ धावांची खेळी साकारली. पण तरीही कोहलीवर तब्बल ११ वर्षांनंतर एक नामुष्की ओढावलेली पाहायला मिळाली आहे. कारण एक नकोसा विक्रम आता कोहलीच्या नावावर झालेला आहे. कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पहिला वनडे सामना तो २००८ साली खेळला. पण या वर्षात कोहलीला सर्वाधिक ५४ धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर कोहलीने प्रत्येक वर्षी धावांचे डोंगर उभारलेले सर्वांनी पाहिले आहे. पण ११ वर्षांनंतर कोहलीवर पुन्हा एकदा वाईट वेळ आली आहे. गेल्या ११ वर्षानंतर पहिल्यांदाच कोहलीला वर्षभरात एकही शतक करता आलेले नाही आणि हा नकोसा विक्रम कोहलीच्या नावावर ११ वर्षांनी झालेला आहे. कोहलीला २००८ साली एकही शतक झळकावता आले नव्हते. पण २००९ साली कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले होते. या वर्षी कोहलीला एक शतक झळकावता आले होते. त्यानंतर २०१० साली कोहलीने तीन शतके लगावली होती. २०११ साली कोहलीच्या नावावर चार शतके होते. त्यानंतर २०१२ साली कोहलीने पाच शतके लगावली होती. २०१३ आणि २०१४ साली कोहलीने प्रत्येकी चार शतके लगावली होती. त्यानंतर २०१५ हे वर्ष कोहलीसाठी फारसे चांगले गेले नव्हते, कारण यावर्षी कोहलीला फक्त दोनच शतके लगावता आली होती. २०१६ साली कोहलीच्या नावावर तीन शतके होती. त्यानंतर २०१७ आणि २०१८ साली कोहली भन्नाट फॉर्मात होता. या दोन्ही वर्षांत कोहलीने प्रत्येकी सहा शतके लगावली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ साली कोहलीने पाच शतके झळकावली होती. पण या वर्षात मात्र कोहलीला एकही शतक झळकावता आले नाही. या वर्षात कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ही ८९ एवढी आहे. आतापर्यंत कोहलीने जवळपास प्रत्येक वर्षांमध्ये शतके झळकावले होते. पण या गोष्टीला अपवाद २००८ आणि २०२० ही दोन वर्षे ठरली आहेत. कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये शतक झळकावण्याची नामी संधी होती. पण कोहलीला यावेळी शतकासाठी ११ धावा कमी पडल्या. आजच्या तिसऱ्या वनडेमध्येही कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला या सामन्यात ६३ धावा करता आल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33xWWTe

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...