Ads

Friday, December 4, 2020

सलग आठ वर्ष रोहित शर्मा भारताकडून करतोय हा विक्रम; २०२० देखील अपवाद नाही

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ सध्या ( ) ला सर्वात जास्त मीस करत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन वनडे आणि पहिल्या टी-२० सामन्यात भारताला फलंदाजीत चांगली सुरूवात मिळाली नाही. रोहित शर्माने भारताकडून अनेक शानदार फलंदाजी खेळी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा तो मुख्य आधारस्तंभ झाला आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे या वर्षी फार क्रिकेट सामने झाले नाहीत. त्याच बरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे फार क्रिकेट खेळू शकला नाही. रोहितने या वर्षी फक्त ३ वनडे सामने खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील रोहित संघात नाही. वाचा- या वर्षात फक्त ३ वनडे खेळून रोहित शर्माने भारताकडून या वर्षी एका सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. २०२० साली वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. तेव्हा रोहितने ११९ धावा केल्या होत्या. फक्त २०२० नाही तर गेल्या आठ वर्षापासून म्हणजे २०१३ पासून प्रत्येक वर्षी वनडेत भारतीय संघाकडून सर्वात मोठी खेळी रोहितने केली आहे. वाचा- भारतीय संघाचा कर्णधार आणि रन मशिन अशी ओळख असेलल्या विराट कोहलीने वेगाने धावा केल्या असल्या तरी याबाबत मात्र रोहित आघाडीवर आहे. या काळात रोहितने ३ वेळा द्विशतक झळकावली आहेत. २०१३ साली २०९, २०१४ साली २६४ आणि २०१७ साली २००८ अशी द्विशतके त्याने केली आहेत. २०१० ते २०२० या काळात वनडेतील एका डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज २०१०- सचिन तेंडुलकर, २०० नाबाद २०११- विरेंद्र सेहवाग, २१९ २०१२- विराट कोहली, १८३ २०१३- रोहित शर्मा, २०९ २०१४- रोहित शर्मा, २६४ २०१५-रोहित शर्मा, १५० २०१६- रोहित शर्मा, १७१ नाबाद २०१७- रोहित शर्मा, २०८ नाबाद २०१८- रोहित शर्मा, १६२ २०१९- रोहित शर्मा, १५९ २०२०- रोहित शर्मा, ११९


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g8e9rA

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...