नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह अन्य खेळाडूंना विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूंना कोणते विक्रम करण्याची संधी आहे. वाचा- १) भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम एलिस्टर कुकच्या नावावर आहे. त्याने भारताविरुद्ध पाच कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध १० सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. कुक आणि कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. तर जो रुटने भारताविरुद्ध चार कसोटीत विजय मिळवला आहे. जर कोहलीने विजय मिळवला तर तो सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरले. त्याच बरोबर रुटकडे देखील विक्रम मोडण्याची संधी आहे. वाचा- २) भारताची फिरकीपटू आर अश्विनला या मालिकेत हरभजन सिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याने कसोटीत आतापर्यंत भारतीय मैदानावर २५४ विकेट घेतल्या आहेत. तर हरभजनने २६५ विकेट. इंग्लंडविरुद्ध त्याने १२ विकेट घेतल्यास अश्विन हरभजनला मागे टाकू शकतो. भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनला दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. या यादीत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे पहिल्या स्थानावर आहे. त्याने भारतात ३५० विकेट घेतल्या आहेत. या शिवाय अश्विनला इंग्लंडविरुद्ध भारतात ५० विकेट पूर्ण करण्यासाठी ८ विकेटची गरज आहे. वाचा- ३) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधार म्हणून ११ हजार ८११ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून करिअरमध्ये १२ हजार धावा करण्यासाठी त्याला १८९ धावांची गरज आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध १८९ धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरेल. याआधी रिकी पॉन्टिंग (१५ हजार ४४०) आणि ग्रीमी स्मिथ (१४ हजार ८७८) यांनी अशी कामगिरी केली आहे. वाचा- ४) इंग्लंडविरुद्ध इशांत शर्माला देखील एक विक्रम करण्याची संधी आहे. कसोटीत ३०० विकेट घेण्यासाठी त्याला फक्त ३ विकेटची गरज आहे. हा टप्पा पार केल्यास कसोटीत ३०० विकेट घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरले. इशांतने २९७ विकेट घेतल्या आहेत. तर भारतात १०० विकेट घेण्यासाठी त्याला २ विकेटची गरज आहे. ५) भारताविरुद्धची पहिली कोसटी ही जो रूटची १००वी कसोटी असेल. २०१२ साली रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याने ५०वी कसोटी भारताविरुद्ध खेळली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39F8ub1
No comments:
Post a Comment