मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना दिल्ली कॅपिटल्सचा संघ सहज जिंकेल, असे वाटत होते. कारण त्यांचा अर्धा संघ ५० धावांच्या आतमध्येच तंबूत परतला होता. पण यावेळी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतकडून मोठी चुक झाली आणि या गोष्टीचा खुलासा दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या एका अनुभवी गोलंदाजाने भेदक मारा केला होता. या गोलंदाजाने तीन षटकांमध्ये फक्त १४ धावाच दिल्या होत्या, त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीवर एकही चौकार राजस्थानच्या फलंदाजांना मारता आला नव्हता. या गोलंदाजाचे एक षटक बाकी होते. त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये या गोलंदाजाला पंतने संधी दिली असती तर सामन्याचे चित्र बदलू शकले असते. पण पंतने तसे केले नाही आणि ही मोठी चुक असल्याचे पॉन्टिंगने मान्य केले आहे. पॉन्टिंगने सामन्यानंतर सांगितले की, " राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती. अश्विनने आपल्या तीन षटकांमध्ये फक्त १४ धावा दिल्या होत्या. त्याचबरोबर राजस्थानच्या एकाही फलंदाजाला त्याचा गोलंदाजीवर चौकार मारता आला नव्हता. माझ्यामते अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याला संधी मिळायला हवी होती. यावेळी संघाकडून नक्कीच ही चुक झाली आहे आणि या गोष्टीवर आम्ही चर्चा करणार आहोत." पॉन्टिंग पुढे म्हणाला की, " आमच्या गोलंदाजांनी ख्रिस मॉरिस फलंदाजी करत असताना स्वैर मारा केला. आमच्या गोलंदाजांचा दिशा आणि टप्पा चांगला नव्हता. जर आपण रिप्लेमध्ये पाहिले तर मॉरिसला आम्ही यॉर्कर टाकले असते तर त्याला जास्त फटकेबाजी करता आली नसती. याविषयी आम्ही संघात चर्चा केली होती आणि रणनितीही आखली होती. पण या रणनितीची योग्य अंमलबजावणी झाली नाही." राजस्थानसाठी मॅचविनर ठरलेल्या नटराजनने १८ चेंडूंत नाबाद ३६ धावांची खेळी साकारली आणि त्यामध्ये चार षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकामध्ये तर मॉरिसने दोन षटकार लगावत सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uPTkao
No comments:
Post a Comment