Ads

Thursday, April 15, 2021

IPL 2021 : दुसऱ्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मिळाली गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू झाला संघात दाखल

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा सामना आज राजस्थआन रॉयल्सबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वीच दिल्लीच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण या सामन्यापूर्वी एक मॅचविनर खेळाडू दिल्लीच्या संघात दाखल झाला आहे. गेल्यावर्षी दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळी दिल्लीसाठी मॅचविनर ठरला होता वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रबाडा आणि अॅनरिच नॉर्टजे यांना खेळता आले नव्हते. कारण या दोघांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला नव्हता. पण आता नॉर्टजेला करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपाचार उपचार सुरु असून त्याला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. रबाडा आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्याच्या क्वारंटाइनचा कालावधीही आता संपलेला आहे. त्यामुळे आता राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी रडाबा हा संघासाठी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे टॉम करनला वगळून यावेळी रबाडाला संधी देण्यात येते का, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर संघात पुनरागमन करणारा रबाडा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. रबाडाच्या समावेशामुळे दिल्लीचे पारडे हे राजस्थानपेक्षा जड झालेले दिसत आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२१ची दिल्ली कॅपिटल्सने शानदार सुरुवात केली आहे. चेन्नईचा सात विकेटनी पराभव केल्याने दिल्लीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. दिल्ली संघात दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा आणि एनरिच नॉर्त्जे हे दोन खेळाडू दाखल झाले आहेत. यातील नॉर्त्जेचा करोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो संघात खेळू शकणार नाही. पण या दोघांशिवाय दिल्लीने फलंदाजीला अनुकुल असलेल्या मैदानात २००पेक्षा कमी धावसंख्येत रोखले होते. पहिल्या सामन्यात राजस्थानचे गोलंदाज अजिबात लयमध्ये दिसले नाहीत. पदार्पणाच्या सामन्यात ३१ धावा देत तीन विकेट घेणारा चेतन सकारिया वगळता अन्य एकाही गोलंदाजाला पंजाबच्या फलंदाजांना रोखता आले नाही. मुस्तफिजुर रहमान, ख्रिस मॉरिस, स्टोक्स, श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतिया यांनी भरपूर धावा दिल्या. या सर्वांना कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3seYriU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...