Ads

Friday, April 16, 2021

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा हा सामना आहे खास, जाणून घ्या कारण...

मुंबई : महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा सामना हा फार महत्वाचा आहे. कारण धोनी हा सामना कधीही विसरू शकणार नाही. कारण धोनीसाठी या सामन्याला एक अनन्य साधारण महत्व आहे. धोनीबरोबरच चेन्नई सुपर किंग्ससाठीही हा सामना महत्वाचा असले. आतापर्यंत धोनीने आयपीेल चांगलीच गाजवली आहे. धोनी आज आयपीएलमधील आपला २००वा सामना खेळत आहे. त्यामुळे धोनीसाठी हा सामना महत्वाचा असेल. त्यामुळेआपल्या २००व्या सामन्यात धोनीकडून कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर चेन्नईच्या संघातील खेळाडू धोनीला या दिवशी विजयाची भेट देणार का, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. त्यामुळे धोनीबरोबरच चेन्नईसाठी हा सामना महत्वाचा असेल. चेन्नईचा माजी खेळाडू शेन वॉटसनने आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये धोनी आयपीएलमधील आज २०० वा सामना खेळणार आहे, असे लिहिलेले आहे. चेन्नईच्या संघाला पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात सुरेश रैनाने अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केले होते. पण महेंद्रसिंग धोनी मात्र शून्यावर आऊट झाला होता. त्याचबरोबर चेन्नईच्या गोलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्यामुळेच त्यांना हा सामना गमवावा लागला होता. आज चेन्नईचा संघ पंजाब किंग्सटशी दोन हात करत आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा संघ विजय मिळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. या आयपीएलमध्ये प्रथम २०० धावा गाठण्याचा मान पंजाबच्या संघाने पटकावला आहे. पंजाबच्या फलंदाजीमध्ये चांगलीच गुणवत्ता आहे. कर्णधार लोकेश राहुलबरोबर ख्रिस गेल, मयांक अगरवाल आणि दीपक हुडा यांचा समावेश आहे. पण पंजाबची गोलंदाजी मात्र कमकुवत वाटत आहे. त्यामुळेच पंजाबने गेल्या सामन्यात २०० धावा करूनही सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला होता. त्यामुळे जर पंजाबला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी कशी होते, हे पाहावे लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OV7uIf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...