मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोना झाला होता. त्यानंतर सचिन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. या गोष्टीवर आता महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनसारख्या व्यक्तीने तरी असं करायला नको होतं, असं या मंत्र्यांनी म्हटलं आहे. सचिन हा रोड सेफ्टीसाठी क्रिकेट मालिकेत भारताकडून खेळत होता. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. त्यानंतर सचिनला सर्वप्रथम करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही करोना झाला होता. सचिनला करोना झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. सचिनबाब यावेळी मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, " जे सेलिब्रेटी आहेत, ते आपल्या घरामध्येही उपचार घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन बेड्स अडवू नयेत. सचिन तेंडुलकर किंवा अक्षय कुमारसारखे सेलिब्रेटी हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, पण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल घेण्याची गरज नाही." शेख यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " सध्याच्या घडीला मुंबईमध्ये हॉस्पिटल्सची काय अवस्था आहे, हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे जे गरजू लोकं आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार सेलिब्रेटींनी नक्कीच करायला हवा." सध्याच्या घडीला मुंबईमधील हॉस्पिटल्सची अवस्था फार बिकट आहे. कारण हॉस्पिटल्समधील बेड्स संपलेले आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन आणि काही औषधांचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे जर सेलिब्रेटींना जर घरातच उपचार घेता येत असतील तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊ नये, अशी आशा शेख यांनी यावेळी व्यक्त केली आहे. भारतीय संघातील सचिननंतर युसूफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. हे सर्व आता करोनामधून बरे झालेले पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्येही काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e3bZsB
No comments:
Post a Comment